मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा त्यानंतर राज्याचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत पोलखोल सभा झाली. त्यासभेत त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टिका केली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. अशातच आता 14 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. त्यावर त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
“राज ठाकरेंच्या भोंग्याचा आता झाला ठेंगा”; गुलाबराव पाटलांनी उडवली खिल्ली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुकांच्या काळात थापांचा सुकाळ असतो. ही थापेबाजी परवडणार नाही. परंतु लोक अशाप्रकराची थापेबाजी सतत सहन करू शकत नाही. किंबहुना त्यांनी ही सहन करू नये. 14 तारखेला मी सभा घेणार आहे. तेव्हा तुमच्याशी मनातलं बोलणार आहे. उठसूठ इकडे, तिकडे वार असं करणार नाही. जे मनात आहे ते तुमच्याशी बोलणार असं ते म्हणाले.
“भोंग्यांवर कसले बोलताय महागाईवर बोला”; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
माझ्या मनात काही तुंबलेले नाही, परंतु मनातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. राजकारण जरूर करा परंतु त्यामध्ये एक दर्जा असला पाहिजे. विरोधी पक्ष हा निव्वळ विरोध करण्यासाठी नसतो. सरकारचे चुकत असेल तर आमचे कान उपटा पंरतु चांगलं काम केल्यास कौतुकही झालं पाहिजे. पण ही दिलदारी सध्याच्या विरोधी पक्षाकडे नाही असंही त्यांनी सुनावलं.
राज्याचे उपमुख्यमंत्री अॅक्शन मोडवर; भाजप दिला दणका, ‘त्या’ नेत्याचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार चर्चेत आला आहे. त्यावरून भाजप आणि मनसे शिवसेनेवर निशाणा साधत आहे. त्यामुळे आगामी सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्दयावरून विरोधी पक्षांवर टिकास्त्र सोडण्याची शक्यता आहे.
Read also:
- पक्षशिस्तीचे पालन न केल्यास..; मनसेकडून पदाधिकाऱ्यांना समाज माध्यमांवर भाष्य न करण्यास सुचना
- “काही असुंतष्ट आत्मे पक्ष सोडण्याबाबत अफवा पसरवताहेत, अशा लोकांपासून पक्षाला धोका”; वसंत मोरे
- “आघाडीच्या नेत्यांनी ओबीसी समाजाला लॉलीपॉप दाखवले”; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर घणाघात
- शिरूरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा राजकीय ‘ठिणगी’; ‘पुढचा खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलच होणार !’, राऊतांची घोषणा
- राज ठाकरेंनंतर मुख्यमंत्री ठाकरेंची औरंगाबादेत सभा; परवानगीवरुन जोरात राजकारण तापणार?