राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष वरून राजकारण ढवळून निघाले आहे यातच आज राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची काँग्रेस ने हकालपट्टी केली आहे त्यामुळे राजस्थानच्या राजकीय घडामोडींवर देशाचे लक्ष लागले आहे. त्यापार्शवभूमीवर विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ट्वीटद्वारे आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राजस्थानमध्ये भाजपचे सरकार येईल आणि राजस्थाननंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच सरकार जाईल, असे विधान आठवलेंनी केले आहे.
“सचिन पायलट यांचा काँग्रेसमध्ये वारंवार अपमान होत होता. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांना कधीच संधी दिली नाही. मध्यप्रदेशमध्येही ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबाबतही हेच घडले होते . त्यानंतर मध्यप्रदेशातलं काँग्रेसचे सरकार गेले . याचीच पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होईल आणि तिथे सचिन पायलट यांच्या मदतीने भाजपचे सरकार स्थापन होईल. सचिन पायलट यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यामागे खंबीरपणे उभे राहावे .”असे वक्तव्य आठवलेंनी केले आहे.
आठवले पुढे महाराष्ट्राबद्दल बोलताना म्हणतात, “मध्यप्रदेशात जे झालं तेच राजस्थानात होईल. राजस्थानात भाजपचं सरकार स्थापन झाल्यावर महाराष्ट्राची वेळ येईल. महाराष्ट्रातलं सरकार फार टिकणार नाही. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सरकार लवकरात-लवकर जाईल आणि महाराष्ट्रातही भाजपचं सरकार येईल.”