मुंबई : उजनी धरणाच्या पाच टीएमसी पाण्यावरून सुरु झालेल्या संघर्षाला आता मोठे स्वरूप प्राप्त झाले असून, यावरून आता राज्य सरकारला घेरण्याचा आणि अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. सांडपाणी योजनेच्या नावाखाली उजनी धरणातून पाणी ५ टीएमसी पाणी इंदापूरला देण्याच्या सरकारच्या या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यातून होत असलेला तीव्र विरोध सुरुच असून, यावेळेस आंदोलनकर्त्यांनी आणि विरोधकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच इशारा दिला आहे.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नागेश वनकळसे यांनी, सोलापूरचे पाणी इंदापूरला न देण्याचा २२ एप्रिलचा आदेश, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रद्द करत असल्याची फक्त तोंडी घोषणा केली. मात्र, असा कोणताही आदेश रद्द झाल्याचे पत्रक अजूनही प्राप्त झाले नसल्याने सोलापूरकरांच्या मनात या आदेशाविषयी संभ्रम आहे, असे सांगितले आहे.
तसेच, हा निर्णय तातडीने रद्द केला जावा, नाहीतर यासाठी थेट बारामतीत येत्या २६ तारखेला बुधवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय नेते खा.शरद पवार यांच्या घरासमोर (गोविंद बाग) खर्डा-भाकर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले, ‘जलसिंचनाच्या बऱ्याचशा योजना अजूनही अपूर्ण आहेत. त्यांच्या पूर्णत्वासाठी राज्य सरकारने सर्वात आधी लक्ष द्यायला हवे होते. धरणाचे सर्व पाणी वाटप आधीच पूर्ण झाले आहे. अशात धरणाच्या उरात पाण्याचा एकही थेंब राहत नसताना, ‘सांडपाणी’ शब्दाच्या नावाखाली पाणी इंदापूरला नेण्याचा जो प्रकार चालू आहे, तो दुर्दैवी आहे. एकीकडे जयंत पाटील तोंडी सांगतात आदेश रद्द करू, मात्र दुसरीकडे धरणात पाण्याचा नेमका किती साठा आहे, याच्या तपासणीसाठी तीन सदस्यांची समिती नेमली जाते, याचा अर्थ सरळ आहे, की सोलापूरचे पाणी त्यांच्यापासून पळवले जात आहे.
Read Also :
- ‘…तर आम्ही पेढे वाटपाचा कार्यक्रम करू’, संजय राऊतांचा राज्यपालांना टोला
- उजनी पाठोपाठ निळवंडेचेही पाणी पेटले, शिर्डीच्या खासदारांची जयंत पाटलांसह इतर दोन मंत्रावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
- कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीचा बिगुल वाजला; आज पासून अर्ज भरण्यास होणार सुरुवात
- देवेद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यात राजकीय गुफ्तगू; निलेश राणेंचा गौप्यस्फोट
- उजनीच्या पाणी प्रश्नी पंढरपुरात टायर जाळून निषेध ; सोलापूर विरुद्ध इंदापूर संघर्ष वाढणार