ठाणे : महापालिकेतील सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर, अनधिकृत फेरिवाल्याने कारवाई दरम्यान जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात कल्पिता यांच्या डाव्या हाताची बोटे कापली गेली आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, आता या हल्ल्यानंतर ठाणे मनसेने आक्रमक भूमिका घेत फेरीवाल्यांना अनधिकृत गाड्या न लावण्याचा दमच दिला आहे. त्यामुळे, गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या अनाधिकृत फेरिवाल्यांचा विषयाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.
महाविकास आघाडी सरकारची ही ‘घोटाळा इलेव्हन’, किरीट सोमय्यांकडून ११ नावे जाहीर
काय आहे घटना?
कासावडवली येथील मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी महापालिकेच्या, माजिवडा मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या गेल्या असता, त्यांच्यावर एका फेरीवाल्याने चाकूने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे कापली गेली असून, त्यांना वाचवयला पुढे आलेल्या अंगरक्षकाही त्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याचे देखील एक बोट कापले गेले असल्याची माहिती आहे. दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून, हल्ला करणारा फेरीवाला पोलिसांच्या ताब्यात आहे.
भाजप आमदारांचा ५०० कोटींचा घोटाळा, भावना गवळींकडून ईडी चौकशीची मागणी
अमरजीत यादव असे त्याचे नाव असून, कारवाई दरम्यान त्याने पिंपळे यांच्या डोक्यावर चाकू भिरकवला, मात्र त्याचवेळी बचावासाठी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवला आणि त्यांच्या हाताची बोटे कापली गेली. यावेळी स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी संबंधित हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तोच चाकू स्वतःच्या गळ्यावर ठेवून धमकवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला मोठय़ा शिताफीने पकडून अखेर पोलीसांच्या स्वाधीन केले गेले.
Maharashtra: During an anti-encroachment drive in Kasarvadavali, Thane the asst municipal commissioner was attacked by a vegetable vendor. She sustained injuries on two of her fingers, bodyguard also injured. Condition is stable now, accused arrested:DCP Vinay Kumar Rathod(30.08) pic.twitter.com/lx95LFxhj4
— ANI (@ANI) August 31, 2021
गेल्या काही दिवसांपासून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून, शहरातील अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाल्यांवर कारवाई सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकाने, घोडबंदर भागातील कासारवडवलीतील मार्केटमधल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर, सांय. ६.३० च्या सुमारास कारवाई केली असता, संतप्त फेरीवाल्याने रागाच्या भरात हे कृत्य केले.
Read Also :
- औरंगाबादच्या कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली; अनेक वाहनं दरडीखाली
- मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार; वाचा महापालिका प्रशासनाची नवी नियमावली…
- रासपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची माळ पुन्हा महादेव जानकारांच्या गळ्यात
- “एक ना एक दिवस आमचेही दिल्लीत दिवस येतील”, ईडीच्या छापेमारीवरून संजय राऊतांचा इशारा
- एसटी कर्मचाऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस सरसावले, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली विनंती