दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपुर्वी मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. जर गुजराती माणूस मुंबई सोडून गेला तर मुंबईला आर्थिक राजधानी कोणीही म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केले होते. यानंतर आता पंतप्रधान मोदींमुळे भारतीय लोकांना परदेशात विचारलं जातं असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे. यावर आता राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे.
पाटलांच लेक राजकारणात होतंय सेट
राज्यपालांच्या वक्तव्यावरून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. राज्यपाल हे भाजपचे घरगडी आहेत असं सुचक वक्तव्य त्यांनी केले. यामुळे भाजप नेत्यकडून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. यावरून केंद्रीय मंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही नेत्याने मोठ्या व्यक्तींवर पातळी सोडून बोलणे ही महाराष्ट्राची संक्कृती नाही. आम्हीही विरोधी पक्षात होतो तेव्हा सत्तेतल्या एकदम मोठ्या नेत्या विषयी विचार करून बोलत होतो. आजही आमच्या पेक्षा मोठ्या लोकांवर बोलताना विचार करून बोलतो, असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.
इच्छुकांना अजून कळ काढावी लागणार; महापालिका, ZP निवडणुका आता पुढच्याच वर्षी
राज्यपाल म्हणजे भाजपचा घरगडी आहे, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. देशात भाजपकडून दडपशाही सुरू आहे. राज्यपाल कोश्यारींना मराठी माणसांच्या विरोधात केलेल्या विधानावरून लक्ष हटवण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केल्याचा आरोपही भास्कर जाधव यांनी केला आहे.
“अजित पवार माध्यमांशी बोलताना गोंधळले; म्हणाले, मी राज्याचा उप..”
राज्यातील 271 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने 82, शिंदे गट 40, शिवसेना 27, राष्ट्रवादी काँग्रेस 53, काँग्रेस 22 तर इतर 47 असा निकाल लागला आहे. यामध्ये भाजपने बाजी मारली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्टर शेअर केला आहे. यामध्ये शिंदे गटाचा उल्लेख हा शिवसेना असा केला आहे, तर शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट असा केला आहे. याविषयी प्रश्न विचारला असता कोर्टाकडून जेव्हा निर्णय येईल तेव्हा महाराष्ट्राला खरी शिवसेना कोणती हे कळेल, असंही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.
Read also
- “काँग्रेसचा विरोध हा ईडी आणि महागाईला नसुन श्रीराम मंदिराला आहे”
- नाशिक, औरंगाबाद आता जालना ; खोतकरांनी दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जालना भेटीचे निमंत्रण
- आता गुलाल पुढच्याच वर्षी; जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुक प्रक्रिया स्थगित
- “राज्यात कुठेही संकट आले तर राष्ट्रवादीची टोपी सगळीकडे दिसायला हवी”
- “आगामी महापालिका, ZP व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपाच नंबर वन ठरेल”