नागपुर : जागतिक आदिवासी दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आदिवासी विभागाच्यावतीने सांस्कृतिक महोत्सव व गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी राजकारण्यांवर टोलेबाजी करत म्हटलं की पत्नी, मुलगा नाही तर ड्रायव्हर किंवा चमच्यासाठी उमेदवारी मागतात. त्यामुळे उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला.
गुगलचा अजब पराक्रम; शिंदे गटातील आमदार भारतीय जनता पक्षात
आपल्याला विकास करायचा असल्यास स्वत:च्या हाताने करा. शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासातून शक्य आहे. शिक्षणाची सोय होणे आवश्यक आहे. हजारो इंजिनीअर, डॉक्टर, वकील झाल्यास समाजाची प्रगती निश्चित होईल. आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी रस्ते, वीज, पाणी आणि कन्टेक्टव्हिटीत स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
“महाविकास आघाडी विपरीत परिस्थितीमध्ये बनवलीय, ती तुटू शकते”
नितीन गडकरी यांनी आपल्या खुमासदार शैलीत पुन्हा एकदा राजकारणावर टोलेबाजी केली. ते म्हणाले की देशात एव्हाना राज्यात आमदार, खासदार, मंत्री खूप होतात आणि जे होतात ते मुलाबाळांचा विचार करतात. परंतु आता सध्या पत्नी, मुलगा नाही, तर ड्रायव्हर किंवा चमच्यासाठी देखील ते उमेदवारी मागतात. ज्यांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले त्यांनी आतापर्यंत निदान त्यांच्या समाजाची देखील उन्नती केल्याचे अजुन दिसत नाही. काहींनी केली असल्यास अपवाद असतील, असं देखील नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
लढणार, भिडणार, आणि जिंकणार; विरोधी पक्षनेता पदी निवड झाल्यानंतर आंबादास दानवेंचं जंगी स्वागत
यापुर्वी शेतमालाची पॅकिंग आणि उत्पादन याविषयी बोलताना नितीन गडकरी म्हणाले होते की, तुम्ही उत्पादन आणि पॅकिंग चांगल करायला हवं. एकतर परमेश्वर किंवा सरकार असं नको व्हायला. देवानं दिल अन् देवान नेल असं जमत नाही. देवाचा आशीर्वाद जरूर पाहिजे. पण देवाचा आशीर्वाद आहे. लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केल तर पोरंग कसं होणार, तुम्हालाही काही पुढाकार घ्यावा लागेल, असं नितीन गडकरी म्हणाले अन् सर्वत्र एकच हशा पिकला, नंतर हे उदाहरण लगेच कळते, असं देखील नितीन गडकरी यांनी याआधी म्हटलं होतं.
Read also
- “उद्धव ठाकरेंनी 2019 ला पाठीत खंजीर खुपसलं, त्यांच्याच कर्माची ही फळ”
- “पंकजा मुंडेंवर सतत अन्याय होतोय, त्यांनी वरिष्ठांना भेटावे”; खडसेंचा पंकजा मुंडेंना सल्ला
- “तर या बिनखात्याच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काय उपयोग?” काॅंग्रेसचा तिखट सवाल
- “तर या बिनखात्याच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काय उपयोग?” काॅंग्रेसचा तिखट सवाल
- “महाविकास आघाडीत फूट पडणार”?नाना पटोलेंच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं सुचक वक्तव्य