बीड : ‘मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही’, अशी घोषणा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. बीडमध्ये आयोजित भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत असताना पंकजा यांनी ही घोषणा केली.
विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन हर्षवर्धन पाटलांची कन्या, राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीला
या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘मी आता ही लढाई लढायचं ठरवलंय. बीड जिल्ह्यानं एक वेगळं उदाहरण घालून दिलं पाहिजे. ज्याला आज खुर्चीवर बसायचंय, त्याला हेच पाहिजे. आपसात भांडा आणि मरा. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे नाही केलं. सोशल इंजिनिअरिंग करणारा जगातील पहिला माणूस कोण असेल तर ते शिवाजी महाराज होते. मुंडे साहेबांना विचारलं तुमचं राजकीय गुरु कोण, तर ते म्हणायचे मी राजकारण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य कारभार डोळ्यासमोर ठेवतो,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी मी राजकीय आत्महत्या करण्यास तयार, खासदार अमोल कोल्हेंची आक्रमक भूमिका
पंकजा पुढे म्हणाल्या की, ‘माझे इतर पक्षांमध्येही चांगले संबंध आहेत. मला वाटतंच नाही की मुख्यमंत्री बदललेत. गोपीनाथ गडावर भागवत कराड आले म्हणून मला विचारलं, तेव्हा मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे येऊन गेले, छगन भुजबळ मंत्री झाल्यावर आले होते, दोन्ही छत्रपती येऊन गेले अमित शहा येऊन गेले सगळं घेऊन गेले गोपीनाथ गड ही लोकनेते मुंडे साहेबांची समाधीस्थळ आहे,’ असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
Read Also :
- राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे; संदीप देशपांडेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
- पुणे शहराला खड्ड्यात घालवून भाजपची खोटी बॅनरबाजी; राष्ट्रवादी स्पर्धेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांची पोलखोल करणार
- प्रशासकीय यंत्रणांनी दबावाखाली भेट टाळली, पालघर दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री भारती पवारांचा आरोप
- “जेवणाला बोलावलं मात्र हात बांधलेले, ही शुद्ध फसवणूक; आरक्षणावरुन शरद पवारांची केंद्रावर टीका
- “…तेव्हा मी त्यांना उत्तरे देईन,” भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून खासदार भावना गवळींचे किरीट सोमैयांना आव्हान