नवी दिल्ली : देशात महमरीच्या धगधगत्या झळा सोसत आहे. दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच देशभरात असणाऱ्या रेमेडीसीवर आणि इतर औषधांच्या, लसींच्या आणि ऑक्सिजनच्या अभावी महामारीने बाधित रुग्णांचे हाल होताना आणि अनेकांचे दुर्दैवी मृत्य होतानाचे चित्र माध्यमांवरून सातत्याने दाखवले जात आहे.
दरम्यान, देशात असणाऱ्या या रेमेडीसीवर आणि इतर औषधांच्या, लसींच्या, ऑक्सिजनच्या आणि इतर धोरणांसंबंधीच्या अपुऱ्या पुरवठ्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. या मुद्यांवरून आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी ऑक्सिजन पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत एक अशी व्यवस्था बनवली जावी, ज्याद्वारे लोकांना कळाले पाहिजे की ऑक्सिजनचा किती प्रमाणात पुरवठा केला गेला आहे आणि कोणत्या रूग्णालयात किती ऑक्सिजन उपलब्ध आहे.
तसेच, न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, ”आम्ही हे देखील ऐकत आहोत की, नागरीक ऑक्सिजन सिलिंडरसाठी रडत आहेत. दिल्लीत खरोखर ऑक्सिजन उपलब्ध नाही, गुजरात, महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे. सरकारला आम्हाला हे सांगाव लागेल की आज आणि सुनावणीनंतरच्या दिवसापासून परिस्थीतीत काय फरक पडेल.”
याशिवाय न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, आमच्या समक्ष काही अशा देखील याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत, ज्या गंभीर स्वरूपात स्थानिक मुद्दे समोर आणत आहेत. अशा मुद्दे उच्च न्यायालयात उचलले गेले पाहिजेत.
Supreme Court begins hearing in the case where it took suo moto cognizance on issues related to oxygen supply, drug supply, and various other policies in relation to the #COVID19 pandemic. pic.twitter.com/WfgBAXCEXV
— ANI (@ANI) April 30, 2021