कोल्हापूर : महाराष्ट्र ६ विधानपरिषद जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. ६ च्या ६ जागा बिनविरोध करण्यासाठी सर्वच पक्ष तयारीत आहे. भारतीय जनता पक्षाने संजय केनेकर यांचा अर्ज माघारी घेवून काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांची पोटनिवडणूक बिनविरोध केली. डॉ. प्रज्ञा सातव या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत.
स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला झटका; राष्ट्रवादीने उचललं मोठं पाऊल..
त्यानंतर काँग्रेसनेही मुंबईतील अपक्ष संजय कोपरकर यांचा अर्ज माघारी घेत मुंबईच्या २ जागा बिनविरोध केल्या. यामध्ये माजी आमदार यांचं शिवसेनेतर्फे राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. त्यामुळे आता उर्वरित ४ जागांवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे कळतयं. कोल्हापूरच्या हाय होल्टेज लढतीकडे बघता कोल्हापुरात निवडणूक बिनविरोध होण्याची धाकट्या कमी आहे. कारण ही फक्त निवडणूक नसून दोन घराण्यांमधील संघर्षाची नांदी आहे. एकेकाळचे कट्टर मित्र असणारे बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक यांच्यातील हा राजकीय संघर्ष आहे. महाडिकांना सर्वच पदावरून घालणारे बंटी पाटील यावेळी विजयी होनार की अमल महाडिक बाजी मारणार ? याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
‘तुटेपर्यंत ताणू नका, एकदा तुटलं तर जोडणार नाही’; अनिल परब यांचा इशारा
यातच जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्याने गुंतागुंत आणखी वाढली आहे. महाडिक विरुद्ध पाटील संघर्ष कोणाच्या पथ्यावर पडणार याची चिंता आता नेत्यांना सतावू लागली आहे. गेल्या सहा वर्षात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेला प्रगतीपथावर नेले आहे. या जोरावरच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असताना किमान सहा तालुक्यातील विकास सोसायटी गटातच काहींनी बंडखोरीचा इशारा दिला आहे. त्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हेही या निवडणुकीत ताकदीने उतरण्याची शक्यता आहे. विकास सोसायटी गटात नसेना पण इतर गटाताली काही जागांवर तुल्यबळ उमेदवार देऊन त्या गटातील विद्यमान संचालकांना शह देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
आम्हाला नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; हिंगोलीतील शेतकऱ्यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
किमान सहा तालुक्यात विकास संस्था गटातील विद्यमान संचालकांविरोधातच काहींनी दंड थोपटले आहे. त्यात शिरोळमधून गणपतराव पाटील हे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विरोधात, गडहिंग्लजमध्ये संतोष पाटील यांच्याविरोधात पाच-सहा जण, राधानगरीतून ए. वाय. पाटील तर भुदरगडमधून के. पी. पाटील यांच्याही विरोधात उमेदवारांनी बंडाचे निशान फडकवले आहे. अशा परिस्थितीत उर्वरित गटात भाजपने तुल्यबळ उमेदवार दिल्यास ही निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता आहे.
Read Also :
- राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न ‘या’ ठिकाणी नाहीच; लंके विरुद्ध औटी यांच्यात होणार प्रतिष्ठेची लढाई
- राज्यात ठाकरे, पवार यांनी एकत्र यावं ही तर बाळासाहेबांची इच्छा; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
- ठरलं तर…! विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय
- ‘भाजपचे नेते एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून भडकवत आहेत’, मलिकांचा आरोप
- प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय? संजय राऊतांचा सदावर्तेंना रोखठोक सवाल