मुंबई : दिवसेंदिवस ईडी अनिल देशमुखांवरचा फास आवळत चालल्याचे दिसून येत असून, काल नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजवर छापा टाकल्यानंतर, आज ईडीने देशमुखांच्या मालकीच्या हॉटेलवर छापेमारी केली आहे. याआधीही त्यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला होता. तसेच, १६ जुलैला ईडीने देशमुखांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. मनी लॉंड्रिंगप्रकरणी ईडीने ही कारवाई केली होती.
“ही नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद”, पंतप्रधान मोदींवर काँग्रेसची बोचरी टीका
ईडीच्या टीमने वर्धा रोडवरील देशमुख यांच्या ‘ट्रॉयटोल’ हॉटेलवर छाप टाकला आहे. यावेळी ईडीने आपल्यासोबत सीआरपीएफचे एक पथकसोबत आणले होते. काल ईडीने देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेच्या NIT कॉलेजवर छापा टाकला होता. तब्ब्ल ३ तास ईडीची छापेमारी चालली. ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी या संस्थेच्या वापर केला असल्याचा देशमुखांवर आरोप आहे. त्यासाठी बोगस शेल कंपन्यांचा वापर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर काल ईडीने छापेमारी केली.
मिसेस फडणवीसानंतर आता मिस्टर फडणवीस; पुणे मेट्रोच्या श्रेयासाठी मोदींच्या नावाची कुरघोडी?
कारवाई दुपारपर्यंत सुरूच होती. यासोबतच, इतरही काही ठिकाणांवर छापे टाकल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. कारवाईदरम्यान अकाउंट्ससह संगणाकतील इतर माहिती अधिकाऱ्यांनी गोळा केली असून, अनिल देशमुख या संस्थेचे अध्यक्ष, त्यांचा मोठा मुलगा सलिल उपाध्यक्ष, त्यांची पत्नी आरती देशमुख आणि पीए कुंदन शिंदे हे दोघे या संस्थेवर पदाधिकारी असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेच्या मुखपत्रातून फोडला गेला राजकीय बॉम्ब, अजून एका ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाचे संकेत?
दुसरीकडे, अनिल देशमुख यांच्या अडचणीत कोर्टाने देखील वाढ केली असून, सुप्रीम कोर्टात अटक होऊ नये म्हणून, त्यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच, सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातील दोन परिच्छेद वगळण्यात यावेत, ही राज्य सरकारची याचिकाही हायकोर्टाने फेटाळली आहे. तसेच, ईडीने ४ समन्स बजावल्यावरही देशमुख पिता-पुत्र चौकशीसाठी हजर राहिले नसल्याने ईडी आता आक्रमकपणे देशमुखांवर कारवाई करत असल्याचे दिसून येत आहे.
Read Also :
- २०२४ ला आमचं एकच इंजिन असणार; देवेंद्र फडणवीस यांच मोठं विधान
- भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाच्या कंड्या पेटवू नका; बातम्या कमी पडल्या तर मला मागा – देवेंद्र फडणवीस
- “चावी आपल्या हातात आहे अंदाज घेऊन फिरवू कशी फिरावायची” मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान
- … तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींना ३०% जागा देणार, काँग्रेसची मोठी घोषणा
- “दगडातूनही तेल काढू शकतात, भलताच ब्रिलियंट माणूस”, राज्यपालांकडून गडकरींचं तोंडभरून कौतुक