पिंपरी चिंचवड: तळीये,महाड आणि चिपळूण येथे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे.त्यामुळे,आपले कोकण मोठ्या संकटात सापडले आहे.या आपल्या बांधवांना आणि या परिसरातील सावरण्यासाठी आता आपण पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.यासाठी अन्नधान्य,वस्तू,किंवा आर्थिक स्वरुपात मदत केली पाहिजे,आपण पुढे येवून कोकणातील बांधवांना मदत करूया,असे आवाहन भोसरीचे आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी केले आहे.
गेल्या दोन वर्षापूर्वी अशाच प्रकराचे संकट कोल्हापूरात आले होते. त्यावेळी आमदार महेश लांडगे यांनी कोल्हापूरकरांना एक हात मदतीचा या उपक्रमार्तंगत अन्नधान्य, वस्तू आणि आर्थिक मदत पुरवली होती. त्याचबरोबर चक्रीवादळात काही दिवसांपुर्वी कोकणात ओढवलेल्या संकटात देखिल आमदार महेश लांडगे यांनी भरघोस मदत केली होती. लांडगे हे संकट काळात नेहमीच धावून येतात. आता तळीये येथे झालेल्या दुर्घटनेत कोकण संकटात सापडले असताना आमदार लांडगे पुन्हा एक हात मदतीचा घेवून पुढे सरसावले आहेत.
खालील क्रमांकावर संपर्क करा
आपण पुरग्रस्ताना वस्तू स्वरुपात मदत देण्यासाठी दिपक शर्मा मो. ९६८९८६६८०४ या नंबर वर संपर्क साधा, तसेच आपण आर्थिक मदत देण्याकरिता संजय पटनी ९८२२२१७१६३ या नंबरवर आपण गुगल पे करु शकता, तसेच पुरग्रस्तांना मदत हवी असल्यास तात्काळ आपण सचिन फोंडके ७७२००४३८६२ या नंबर संपर्क साधण्याचे आवाहन लांडगे यांनी केले आहे.
नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
काय मदत कराल?
आपण कोकणातील लोकांना तीन किलो तांदूळ दोन किलो पीठ एक किलो तूर डाळ एक किलो एक तेल पाकीट एक मिठाचे पाकीट आणि 50 ग्रॅम ची मिरची पावडर 50 ग्रॅम हळद पावडर आवश्यक साहित्य बकेट पाणी बॉटल बिस्कीट या सुरुवात आपण सर्व मदत करणार आहोत ही साहित्य व आर्थिक मदत स्वीकारण्याचा दिनांक 25 जुलै ते 27 जुलै 2019 पर्यंत आहे. मदत करणाऱ्यांनी भोसरीतील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात मदत पाठविण्याचे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.
Read Also :
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
- “हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेल”
- उदयनराजेंची जनतेला आर्त साद, “बांधवांनो धीर सोडु नका, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत”
- ‘म्हाडा’ने उचलली तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
- ‘कृष्णकुंज’वर एकाच मागणीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी, राज ठाकरे लवकरच घेणार मोठा निर्णय!