मुंबई : शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकार आणणार असल्याची घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात गेली अनेक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणलेले कायदे शेतकरी विरोधी असल्याचे म्हणत थोरात यांनी घोषणा केली आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत राज्याच्या कृषी सुधारणा विधेयकावर चर्चा केली. त्यानंतर थोरात यांनी ही घोषणा केली.
येत्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
केंद्र सरकारने सुधारणेच्या नावाखाली आणलेले काळे कृषी कायदे शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे आहेत. साध्या पॅन कार्ड वर कुठलाही व्यापारी शेतकऱ्याचा माल विकत घेऊ शकतो, यात जर फसवणूक झाली तर जबाबदारी कोण घेणार? या सर्वच गोष्टींचा विचार कृषी सुधारणा विधेयक तयार करताना आमच्या सरकारने केला आहे, असे थोरात म्हणाले.
Read Also :
- फडणवीसांच्या पुतण्याने आरोग्य कर्मचारी म्हणून घेतली होती लस, RTI मधून स्पष्ट
- ‘अजित पवारांना गजनी झाला आहे का?’
- भाजप नेत्यांची बैठक म्हणजे चार तासांचा ‘कुटाणा’, अमोल मिटकरींची टीका
- ‘…म्हणजे मुख्यमंत्री घरी बसायला मोकळे’, भातखळकरांचा खोचक टोला
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली शरद पवारांच्या प्रकृतीबाबत विचारपूस