चिपळूण : अतिवृष्टीने बाधित झालेल्या आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेल्या चिपळूणचा ४ दिवसांनंतर आज मुख्यमंत्र्यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी पुरामुळे उध्वस्त झालेल्या लोकांच्या भावना, व्यथा, प्रश्न ऐकून घेतले, जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यसोबत खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, परिवहन मंत्री अनिल परब होते.
राज्याला मुख्यमंत्रीही नाही आणि प्रशासनही नाही, राणेंची बोचरी टीका
दरम्यान, चिपळूणमधल्या सर्वाधिक नुकसान झालेल्या बाजारपेठेतल्या, एका गल्लीत हा ताफा आला असताना, एका दुकानदार महिलेने, “तुम्हीच आमची मदत करू शकता, हवं तर खासदार-आमदारांचे २ महिन्याचे पगार कोकणसाठी वळते करा, पण आम्हाला वाचावा!” असा टाहो फोडला असता, आमदार जाधवांनी कुत्सितपणे हसत त्या महिलेला, “५-६ महिन्याचा दिला तरी आता काही होणार नाही. तुझा मुलगा कुठंय? ए आईला सांभाळ रे!” असं म्हणत महिलेची चेष्टा केली.
तसेच, मुख्यमंत्र्यांसमोरच आपलं गाऱ्हाणं मांडणाऱ्या एका महिलेवर त्यांनी, थेट हात उगारल्याचा व्हिडीओही सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत असून, यात त्यांनी थेट हात उगारल्याचं स्पष्टपणे दिसुन येत आहे. आता या प्रकरणामुळे भास्कर जाधव चांगलेच अडचणीत सापडले आहेत. यावरून नेटकऱ्यांनी, राज्य सरकार अशा मुजोर लोकप्रतिनिधीवर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
परळीत पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त मुंडे समर्थकांची बॅनरबाजी, मात्र भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे नाव पावसाळी विधिमंडळ अधिवेशनापासुन चांगलंचं चर्चेत आलं आहे. तालिका अध्यक्ष असताना त्यांनी भाजपच्या १२ आमदारांना, गैरवर्तन अरेरावी, अश्लील भाषा वापरली यासाठी कारवाई करून त्यांचं १ वर्षासाठी निलंबन केलं होतं. अशा समंजस आणि न्याय प्रामाणिक असलेल्या नेत्यावर, मुख्यमंत्र्यांसमोर जाहीररीत्या केलेल्या या कृतींसाठी काही कारवाई केली जाणार का? हे अशोभनीय कृत्य करून, त्यांना काय दाखवुन द्यायचं आहे? त्यांना एवढा कसला माज आहे? असे प्रश्न उठत आहे.
Read Also :
- आढावा बैठकीनंतर पूरग्रस्त भागासाठी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय
- एकदा शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या, पुन्हा कधीच भीक मागणार नाही! जगण्यासाठी त्यांनी जोडले हात
- “आमचे आई-वडील तुम्ही आहात, आम्हला काहीही करून जगवा…” चिपळूणकरांनी मुख्यमंत्र्यांसमोर फोडला टाहो!
- ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, निवेदन पाहून अजितदादा भडकले
- चांगल्या-वाईट कामचं प्रशस्तीपत्रं राहू द्या, राजकारण आणि टीका सोडून सध्या पुनर्वसन महत्त्वाचं