मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने राज्याच्या पश्चिम किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विधान सभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर दोघेही रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी फडणवीस यांनी ई पास काढला आहे का, असा प्रश्न उपस्थित करून एका RTI कार्यकर्त्याने, त्यांच्याविरोधात महिती अधिकार याचिका दाखल केली आहे.
यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली असून, “मुख्यमंत्री आता जेव्हा घराबाहेर पडतील, तेव्हा तीच मोठी ब्रेकिंग न्यूज असेल”, अशी खोचक टीका केली आहे. “उद्धव ठाकरे कोणत्या मुहूर्तावर घराच्याबाहेर पडणार, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे”, असं देखील निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 20, 2021
दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाने कर्नाटक, गोवा आणि राज्याच्या प.किनारपला मोठा तडाखा दिल्यानंतर, अखेर ते गुजरातला जाऊन धडकले आहे. दरम्यान, या चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा केला असून, फडणवीस यांनी दौरा काढण्यासाठी ई-पास काढलाय का, अशी प्रश्न विचारणारी एक याचिका आरटीआय कार्यकर्त्याने दाखल केली असल्याची माहिती आहे.
रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी, रविवारी अचानक कोपरगावचा दौरा केला. यावेळी त्यांनी, भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. या भेटीवेळी महामारी संबंधीच्या नियमांचा भंग झाल्याची तक्रार कोपरगाव येथील आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी या याचिकेत केली आहे. त्याअनुषंगाने त्यांनी मुख्य सचिवांकडे, माहितीच्या अधिकारात त्यांनी अर्ज दाखल केला आहे.
Read Also :