मुंबई : मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेवर, “नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी काही जणांची वर्तणूक पाहता चिंता वाटते,” असा निशाणा साधला होता. “कोविड योद्धा नाही तर निदान तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घ्या,” असा सल्लाही त्यांनी दिला होता.
“उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला…”, राणेंचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल
दरम्यान, त्यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, “मुख्यमंत्र्यांची चिंता योग्य आहे पण, हीच गोष्ट त्यांनी राष्ट्रवादीला, काँग्रेसला आणि शिवसेनेलाही सांगितली पाहिजे. ‘आम्हाला फक्त ब्रह्मज्ञान आणि त्यांच्यासाठी कोरडे पाषाण’ असं मुख्यमंत्र्यांनी करू नये, हीच अपेक्षा,” असं म्हणत, “ज्याप्रकारे भाजपला मुंबई आणि राज्यात समर्थन मिळत आहे, ते पाहून नक्कीच विरोधकांना धडकी भरली असेल,” असा विश्वास त्यांनी दर्शवला आहे.
निवडणूक नव्हे, जनता आमच्यासाठी सर्वोच्च!
केंद्रीय मंत्री नारायण राणेजी यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या शुभारंभानंतर माध्यमांशी संवाद..https://t.co/eTo2lVRDTw@MeNarayanRane #JanAshirwadYatra pic.twitter.com/GsnBUPRzje— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2021
….त्यामुळेच भाजपने नेत्यांनी ‘जन आशीर्वाद’ यात्रा काढली, अब्दुल सत्तारांचा मोठा दावा
तसेच, कार्यकर्त्यांवर गुन्हे आणि त्यांना नोटीस बजावल्या जात आहेत, यावर प्रश्न विचारला असता त्यांनी, “आम्ही या गोष्टींना घाबरत नाही. आमचा डीएनए विरोधी पक्षाचा आहे. त्यामुळे आम्हाला केसेस, पोलिसांच्या बळाचा वापर हे आम्हाला नवीन नाही. संघर्ष आमचा पिंड आहे, त्यामुळे पोलिसांच्या बळाचा वापर करून भाजपला दाबणे शक्य नाही,” असे सांगितले. यावेळी, राणे यांना बाळासाहेबांचे दर्शन घेऊ न देणे, ही संकुचित वृत्ती आहे, ज्याला कुठेच स्थान नाही,” असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
“बाळासाहेब आज हवे होते, म्हणाले असते…” नारायण राणेंनी व्यक्त केल्या भावना
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विधानसभेच्या आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून मंत्री आणि खासदार असलेले डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील, यांच्या नेतृत्वाखाली ‘जन आशीर्वाद’ यात्रेला १६ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे, तर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या यात्रेला मुंबईतून सुरुवात झाली.
Read Also :
- बैलगाडी शर्यतीचा वाद पेटला; गोपीचंद पडळकरांना पोलिसांची नोटीस
- राज्यात महाविकास आघाडीमुळे भाजपाला विस्ताराची मोठी संधी’; देवेंद्र फडणवीसांचा दावा
- यामिनी जाधव प्रकरण शिवसेनेला जड जाणार? महाविकास आघाडीच्या गोटात हालचाली वाढल्या
- मुंबई महापालिकेत ‘आम्हीच’ येणार! सेनेच्या होमग्राऊंडवरून राणेंचा हल्लाबोल
- २०१५ च्या निवडणुकीत अस्मान दाखवणाऱ्या तृप्ती सावंतकडून नारायण राणेंचे जंगी स्वागत