मुंबई : मुंबईत पावसाची जोरदार धार कोसळत आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबईची “तुंबई” झाली असून, यामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे दरम्यान, मुंबईमध्ये पावसाचे पाणी परत तुंबल्याने, मुंबई महापालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेवर भाजपने हल्लबोल केला होता. यातच मुंबईच्या प.उपनगरातील मालाड प. मालवणी भागात, ४ मजली इमारतीचा भाग बुधवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून, यात ७ लोक जखमी झाले आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेवरुन देखील भाजपाने शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला असून, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना, भाजप नेत्यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ‘भाजपाला भौ-भौ करत राहू दे. ते अगदी दूध के धुले आहेत’ असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
मालाड प. मालवणी भागात, गेट न. ८ इथे अब्दुल हमीद मार्गावरील ‘न्यू’ कलेक्टर कंपाऊंड भागात बुधवारी रात्री ११ च्या सुमारास इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यात ११ जणांचा मृत्यू झाला असून, यात ७ लोक जखमी लोकांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच, घटनास्थळी दाखल होऊन जवानांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आणि यात स्थानिक लोकांच्या मदतीने इमारतीच्या ढिगाऱ्याखली अडकलेल्या १५ हून जास्त लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपचार घेत असलेल्या जखमींची बीडीबीए रुग्णालयात जाऊन विचारपूस केली असून, मृतांच्या नातेवाईकांना सरकारने ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेत मृत पावलेल्या लोकांना ट्विट करून आदरांजली वाहिली असून, त्यांनी मृतांच्या नातेवाईकांप्रति सहानुभूती व्यक्त केली आहे.
Read Also :
- पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस; प्रत्यक्ष मदत कधी मिळणार? कुणालाच ठाऊक नाही
- ‘सरकारकडून माझ्या मागण्यांवर विचारही झाला नाही आणि कुणी किंमतही दिली नाही’ – संभाजीराजे छत्रपती
- “आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे” – चंद्रकांत पाटील
- ७ वर्षांत भाजपला मिळालेल्या यशाचं श्रेय ‘मोदींच्या चेहऱ्यालाच’ – संजय राऊत
- “शिवसेना हा विश्वासू पक्ष”- शरद पवार