मुंबई : गेल्या ३ दिवसांपासून तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रासह गुजरात आणि गोव्याला जोरदार तडाखा दिला. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोघेही कोकण दौऱ्यावर आहेत. तसेच, उद्या मुख्यमंत्री देखील सिंधुदुर्गचा दौरा करणार असून, यावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे.
भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांवर यावरून निशाणा साधला असून, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे निव्वळ दिखाऊपणा आहे. जसं की, दिखाऊपणासाठी लिपस्टिक लावली जाते आणि लावल्यावर सगळं कसं, अगदी छान, सुंदर आहे असं दाखवलं जातं, तोंड धुतल्यावर मात्र जे खरं आहे ते दिसून येतं, तश्यातला हा प्रकार असल्याची जोरदार टीका त्यांनी केली आहे.
तसेच, देवेंद्र फडणवीसांचा दौरा कोकणातील वस्तुस्थिती ठाकरे सरकारपुढे मांडण्यासाठी होता. मात्र, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याने काहीच साध्य होणार नाही. गेल्यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळापेक्षा या वादळामुळे सिंधुदुर्गाचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. परंतु, मागचाच अनुभव फार वाईट आहे. निसर्ग चक्रवादळाचे पैसे मिळाले नाहीत, तर यावेळेस महाविकास आघाडी सरकारकडून अपेक्षा कशा ठेवणार?”, असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला आहे.
Read Also :
- ‘महाविकास’ सोडाच, हे सरकार तर “आत्मघातकी” सरकार आहे’
- ‘खत दर वाढीवरून जशी टीका केलीत, आता तसंच मोदी सरकारचं कौतुकही करा!’
- ‘राज्यभर फिरण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ई – पास काढलाय का?’ RTI अंतर्गत याचिका दाखल
- शिवसेना खासदार म्हणाला, ‘ नरेंद्र मोदी दिलदार पंतप्रधान’
- ‘ईडी येऊ देत आणि जाऊ देत, आमच्यासाठी ईडी म्हणजे…’