मुंबई : दिल्लीत सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी के. सी. वेणुगोपाल राव यांच्या महामारी संदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मंत्री भारती पवार यांनी, “ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात एकही मृत्यू झाला नसल्याचे लेखी स्पष्टीकरण दिले. दरम्यान, यावरून आता नवा वादंग उभा राहिला आहे.
ओबीसी आरक्षण देण्याची केंद्राची भूमिका नाही, आता भाजपने बोलावं – विजय वडेट्टीवार
यावरून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, “केंद्र सरकार लेखी उत्तरात म्हणतं, ऑक्सिजन अभावी देशातील नागरिकांचे मृत्यू झाले नाहीत? हे तुम्हाला पटतं का? खऱ्यापासून हे सरकार दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं आहे. देशातल्या ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी या सरकारवर न्यायालयात खटलाच दाखल केला पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मोदी सरकारवर टीका केली.
केंद्र सरकार म्हणतंय…”देशात ऑक्सिजन अभावी लोकांचे मृत्यू नाहीत”, विरोधकांकडून हल्लाबोल
दरम्यान, भाजपकडून देखील या टीकेला प्रत्युत्तर दिले गेले असून, भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन, “संजय राऊतांना कदाचित या संपूर्ण प्रकारची माहिती नसावी. ते म्हणाले आम्हाला धक्का बसला, मला त्यांना सांगायचे आहे, संजय राऊतजी, तुम्हाला नाही, तर आम्हालाच धक्का बसलाय! महाराष्ट्र सरकारनेही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून, त्यात राज्यात एकही मृत्यू ऑक्सिजन अभावी झालेला नाही, असे सांगितले आहे,” असा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.
गुन्हेगारांना होर्डिंग लावायला मी सांगितलं होतं का?, अजित पवार भडकले
तसेच, “राज्यात ज्यांचे मृत्यू या कारणाने झाले आहेत, त्यांच्याच नातेवाईकांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केली असता, राज्य सरकारने हे उत्तर दिले आहे. दरम्यान, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी, केंद्र सरकारकडे फोन करून, तातडीच्या ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी केली होती. त्यामुळे केंद्र सरकारवर खोटे आरोप करणे चुकीचे ठरेल,” अशी टीका त्यांनी केली आहे.
Read Also :
- अभिष्टचिंतन : ८० तासांच्या सरकारचे दोन्ही शिल्पकार जन्मले एकाच ग्रह-मानात
- जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा! भाजपची आक्रमक मागणी
- आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल केल्यावरच फायदा होईल – अशोक चव्हाण
- ठाकरे सरकार उचलू शकते मोठे पाऊल! दोन डोस घेतलेल्यांना मिळणार ही सवलत
- मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचे सामर्थ्य सत्ताधारी शिवसेनेतच; भाजपाची खोचक टीका