पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत आज शिरुर-हवेली इथे आले होते. यावेळी, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले आहे. “आम्ही एकत्र काम केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो!” अशी ललकारी त्यांनी दिली आहे. तसेच, “ही मराठ्यांची औलाद आहे. आम्ही समोरून वार करतो,” असा टोलाही त्यांनी पाटलांना लगावला आहे.
तुमच्या स्क्रिप्टनुसार आम्ही काम करायचं का?
दरम्यान, यावर चंद्रकांत पाटलांनी पुण्यात एका कार्यक्रमानंतर बोलताना, जोरदार प्रत्युत्तर दिलं असून, “शरद पवारांनी पाठित खंजीर खुपसल्यावर फक्त शालेय पाठ्यपुस्तकात धडा येण्याचचं राहिलं आहे. ते म्हणतात खंजीर खुपसलं नाही? वसंतदादा पाटील यांच्या पाठित खंजीर कोणी खुपसले? त्यांच्या बाबतीत काय झालं? ही गोष्ट संपूर्ण राज्याला माहिती आहे,” असा टोला चंद्रकांतदादांनी संजय राऊत आणि शरद पवारांना लगावला. ”
वसंतदादा पाटील यांचा विश्वासघात करून पवार साहेब आघाडीतून कसे बाहेर पडले हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे पवार साहेबांची बाजू घेताना इतिहासाची पुनरावृत्ती कधीही होऊ शकते एवढं राऊतांनी ध्यानात ठेवावं. (2/2)
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 5, 2021
पोलिसांनी उधळला धनंजय मुंडेंच्या घातपाताचा डाव; करूणा शर्मा बंदुकीसह पोलिसांच्या ताब्यात
तसेच, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कॅबिनेट मंत्री आहेत. पण त्यांच्या जर-तरच्या वाक्यावरुन अटक होते. त्यापेक्षा संजय राऊत यांचे कोथळा काढू हे वाक्य भयंकर आहे. त्यावर मी फक्त एवढंच म्हटलं की, कोथळा काढायसाठी हातात जे शस्त्र घ्यावं लागतं, ते घेण्यासाठी तुमच्या दंडात तेवढी ताकद आहे का बघा? त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करत राहू, ते कुणीतरी दिलेल्या स्क्रिप्ट नुसार काम करतात. आम्ही देखील तसंच काम करायचं का? असा थेट सवाल त्यांनी यावेळी विचारला.
केंद्रीय मंत्री असतानाही राणे साहेबांच्या वक्तव्यावर अटक करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांच्या 'कोथळा काढतो' या वक्तव्यावरदेखील कारवाई केलीच पाहिजे. राज्य सरकारने घोषित केलेली कोरोनाची मदतही अजून जनतेपर्यंत पोहोचली नाही तर पूरग्रस्तांना हे सरकार कसली मदत देणार ? pic.twitter.com/npk21iRnS3
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 5, 2021
पवारांनी खंजीर खुपसल्याचा एक दाखला द्या, मी राजकारण सोडतो!
यावेळी त्यांनी, राऊत २०१४ पासून आमच्यासोबत सरकार होऊ नये या हेतूने काम करत आहेत. त्यांनी, राष्ट्रवादी, आणि कॉंग्रेसने एकत्रित येऊन सरकार बनविण्यासाठी काम केलं. दुर्दैवाने उद्धवजींना हे लक्षात येत नाही, संजय राऊत हे शिवसेनेसाठी नाही, तर शरद पवार यांच्यासाठी काम करत आहेत. यातून एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होत आहे. कॉंग्रेस लयास गेली आहे. तर शिवसेना दिवसेंदिवस कमकुवत बनत चालली आहे,” असा इशारा देखील दिला.
Read Also :
- समन्सनंतर आता ईडीकडून देशमुखांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी
- “राजकारण आपलं पण जीव जातो जनतेचा”, मुख्यमंत्र्यांनी मनसे-भाजपला सुनावले
- “आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही”, पवारांचा घणाघात
- ग्रामीण भागातील जमिनी हडपण्यासाठी २३ गावे समावेशाचा निर्णय; चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
- “निवडणुकांशिवाय महापालिका ताब्यात ठेवायचा सरकारचा कट”, राज ठाकरेंचा गंभीर आरोप