मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याच्या बातम्या राजकीय वर्तुळात फिरत होत्या. मात्र, आता या बातम्यांना पुष्टी मिळाली असून, आज संध्याकाळी साडे पाच वाजता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी, हा विस्ताराचा कार्यक्रम होणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. दरम्यान, या फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे असून, एकूण ४३ नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यात राज्यातून ४ जणांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागली आहे.
राज्यातून ४ नेते मंत्रीपदी, एकूण ४३ मंत्र्यांची अधिकृत यादी जाहीर, वाचा एका क्लिकवर
महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे यांच नाव निश्चित होतंच. त्यांच्यासोबतच भिवंडीचे खासदार कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांनाही केंद्रीय राज्यमंत्रीपदाची संधी मिळणार आहे. हे खासदार सध्या दिल्लीत आहेत. या केंद्रीय मंत्रिमंडळाचा अवघ्या २ तासात विस्तार होणार असून, केंद्र सरकारने मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या ४३ नेत्यांची अधिकृत यादी आता जाहीर केली. दरम्यान, यात राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळाले असून, याची महिती भाजप प्रवक्ता शिरीष बोराळकर यांनी समाज माध्यमानावर दिली आहे.
असा आहे, शेतकरी पुत्र असलेल्या डॉ. कराड यांचा, नगरसेवक ते केद्रात मंत्री होण्याचा राजकीय प्रवास
- डॉ. कराड अहमदपूर तालुक्यातील चिखली गावातले.
- दहावीपर्यंतचे जिल्हा परिषद शाळेत.
- अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून त्यांनी प्री-मेडिकलचे शिक्षण पूर्ण.
- औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण.
- वैद्यकीय व्यवसाय करत असताना १९९६ ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश.
- (१९९५-२०१०) औरंगाबाद महापालिकेत ३ वेळा नगरसेवक
- स्थायी समितीचे सदस्य, औरंगाबाद महानगरपालिका (१९९५-१९९७ )
- (१९९७-१९९८) औरंगाबादचे उपमहापौर
- औरंगाबाद महापालिका महापौर (एप्रि. २०००-ऑक्टो. २००१ आणि नोव्हें. २००६-ऑक्टो.२००७ २ वेळा महापौर)
- (१९९९ -२००९) भाजपचे सभागृह नेते, औरंगाबाद महानगरपालिका
- २००९ मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी
- राज्यसभा सदस्य ( २०२० )
- भाजप राज्य कार्यकारणीचे उपाध्यक्ष आणि २ वर्षे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष.
- भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख.
- उच्च शिक्षण घेत, मराठवाड्यातील पहिले बालरोग सर्जन म्हणून ओळख.
अखेर रावसाहेब दानवेंची पडली विकेट; तब्बल १० मंत्र्यांचे राजीनामे
त्यांच्या या निवडीमुळे भाजपने राज्यातील ओबीसींना मोदी सरकारमध्ये प्रतिनिधित्व दिले असून, मराठवाड्यात येणाऱ्या विधानसभेच्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकामध्ये भाजप याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच, या प्रदेशात भाजप वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
Read Also :
- वडीलांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी; दोन्ही राणे बंधु दिल्लीत दाखल
- मोठी बातमी! पवारांची लागणार केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी
- मोठी बातमी: मोदींच्या मंत्रिमंडळातून रावसाहेब दानवेंची उचलबांगडी?
- केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता, महाराष्ट्रातून ‘या’ दोन नेत्याची लागणार मंत्रीपदी वर्णी?
- “अखेर काँग्रेसला हात दाखववून कृपाशंकर सिंग यांचा भाजपत प्रवेश, समीकरणे बदलणार