मुंबई : देशात आलेल्या दुसऱ्या लाटेत महामारीचा कहर उभ्या देशाने पाहिला. यात महामारीने झालेले मृत्यू तर होतेच, पण यावेळी देशात ऑक्सिजन अभावी, योग्य वेळेत आवश्यक ते उपचार न मिळाल्याने देखील अनेक मृत्यू झाले. मात्र, सध्या सुरु असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महामारी संदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून, “ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात एकही मृत्यू झाला नाही,” असे लेखी स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, यावरून आता नवा वादंग उभा राहिला आहे.
या कारणामुळे जितेंद्र आव्हाडांवर गरजले अजित पवार, भर बैठकीत म्हणाले…
सरकारच्या या उत्तरावर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर बोलताना, “केंद्र सरकार लेखी उत्तरात म्हणतं, ऑक्सिजन अभावी देशातील नागरिकांचे मृत्यू झाले नाहीत? हे तुम्हाला पटतं का? खऱ्यापासून हे सरकार दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं आहे. देशातल्या ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी या सरकारवर न्यायालयात खटलाच दाखल केला पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
उपमुख्यमंत्र्यांनंतर ‘अनलॉक’ बाबत राजेश टोपेंचेही सूचक विधान!
दरम्यान, आता राज्य भाजपकडून या टीकेवर उत्तर देण्यात आले असून, भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट करून, “ऑक्सीजन अभावी एकही मृत्यू झाले नाहीत असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा असं संजय राऊत यांच म्हणणं आहे. मग, महाराष्ट्र सरकारने मे महीन्यात मा.उच्च न्यायालयात एकही मृत्यू ऑक्सीजन अभावी राज्यात झाला नाही अस प्रतिज्ञापत्र दिलयं. मग, राज्यसरकारवर ही राऊतजी खटला भरणार आहेत का ?’ असा तिखट सवाल केला आहे.
फडणवीसांना माझे नेते मानण्याचा विषयच नाही कारण…पंकजा मुंडेंचे पुन्हा स्पष्टीकरण
दुसरीकडे, भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन, “संजय राऊतांना कदाचित या संपूर्ण प्रकारची माहिती नसावी. ते म्हणाले आम्हाला धक्का बसला, मला त्यांना सांगायचे आहे, संजय राऊतजी, तुम्हाला नाही, तर आम्हालाच धक्का बसलाय! महाराष्ट्र सरकारनेही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून, त्यात राज्यात एकही मृत्यू ऑक्सिजन अभावी झालेला नाही, असे सांगितले आहे.”
Read Also :
- जे केंद्राने सांगितले तेच ठाकरे सरकारनेही केले आहे, “संजय राऊतजी, तुम्हालाच नाही, तर आम्हालाही धक्का बसलाय!”
- अभिष्टचिंतन : ८० तासांच्या सरकारचे दोन्ही शिल्पकार जन्मले एकाच ग्रह-मानात
- जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा! भाजपची आक्रमक मागणी
- आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल केल्यावरच फायदा होईल – अशोक चव्हाण
- ठाकरे सरकार उचलू शकते मोठे पाऊल! दोन डोस घेतलेल्यांना मिळणार ही सवलत