मुंबई : राज्यात मराठा आरक्षणानंतर सध्या, ओबीसींचा, स्थानिक स्वराज्य संस्थेततील राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण तापले आहे. भाजपने यावरून सत्तेतील महाविकास आघाडीला धारेवर धरलं असून, महाविकास आघाडीकडूनही भाजप, ‘ओबीसी विरोधी पक्ष’ कसा आहे, हे दाखवण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
भाजप नेत्यांची तोंडे बंद करण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा असा गनिमी कावा
यातच आज पुन्हा एकदा राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी, या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका करत, भाजप कसा ओबीसींचाच पक्ष आहे, याचा पुनरुच्चार केला आहे. आज भाजपकडून राज्यात, ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या कार्यक्रमावेळी फडणवीस यांनी, “सरकारच्या वेळकाढूपणामुळे ओबीसी आरक्षण गेलं, हे आरक्षण संपवण्याचं काम या सरकारनं केलं आहे,” असा आरोप ठाकरे सरकारवर केला आहे.
मुख्यमंत्री आज पंढरपूरकडे रवाना होणार, २० जुलै रोजी सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार
तसेच, “ओबीसींचा, स्थानिक स्वराज्य संस्थेततील राजकीय आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा झाला आहे. रोज खोटं बोल पण रेटून बोल, असं या सरकारमधे सुरु असून, इथे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात. कारण त्यांना हे कळून चुकलं आहे की आपल्याच चुकीमुळे हे आरक्षण गेलं आहे,” असं म्हणत त्यांनी, “या सरकारने फक्त वेळेकाढूपणा केला. न्यायालयाने सांगूनही राज्य मागसवर्गीय आयोग गठीत केला नाही. त्यामुळे शेवटी न्यायालायने सर्व राजकीय आरक्षण रद्द केलं. आता जोवर हे आरक्षण मिळवून देणार नाही, तोवर आम्ही शांत राहणार नाही,” असा घणाघात त्यांनी केला.
…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा; पृथ्वीराज चव्हाण यांचा सल्ला
यावेळी, मोदी सरकारची स्तुती करताना त्यांनी, “देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री हे ओबीसी समाजाचे आहेत. त्यामुळे देशात मोदींच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने बहुजनांचं राज्य आहे आणि ओबीसींचा खरा पक्ष हा भारतीय जनता पक्षच आहे,” असं सांगितलं. मात्र, प्रत्यक्षात केंद्रात एक वेगळंच चित्र आणि राज्यात एक वेगळंच चित्र भाजपत पाहायला मिळत आहे. त्यामुळे, राज्य आणि केंद्रीय पातळीवर असलेल्या भाजप नेतृत्वातला हा फरक स्पष्ट दिसून येत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
Read Also :
- उद्धव ठाकरेंबद्दल मला आदर; ‘त्या’ वादावर खासदार डॉ. अमोल कोल्हेंकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न
- पांडुरंगाच्या महापूजेला येऊ नका, बंडातात्या कराडकरांची मुख्यमत्र्यांना हात जोडून विनंती
- “पंतप्रधान-गृहमंत्र्यांना दिलेली सुरक्षा अनावश्यक” म्हणणाऱ्या राऊतांची, चित्रा वाघ यांनी उडवली खिल्ली
- मनसेचे मिशन २०२२: राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यात पदाधिकाऱ्यांसोबत जोर बैठका
- पावसाळी अधिवेशन: ‘दलित, महिलांनी मंत्री झालेलं विरोधकांना बघवत नाही’