मुंबई : दिल्लीतील निर्भया सारखीच संतापजनक आणि लाजिरवाणी अशी घटना मुंबईतील साकीनाका मध्ये घडली आहे. अमानुष अत्याचाराला सामोरे जावं लागलेल्या पीडितेवर, घटनेनंतर तीन दिवस मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते. अतिरक्तस्त्रावामुळे तिची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. मात्र आज अखेर मृत्यूशी सुरु असलेली तिची झुंज अपयशी ठरली असून तिचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गहिवरून अतिशय संतापजनक अशी प्रतिक्रिया दिली असून, त्या महिलेची विचारपूस करण्यासाठीच त्या जात असताना या भगिनीचा मृत्यू झाल्याने, त्यांना अक्षरश: ढसाढसा रडू आले. यानंतर त्यांनी अक्षरशः ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले असून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. राज्यातील महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका! असा घणाघात त्यांनी केला.
#UPDATE | A 30-year-old woman, who was found lying unconscious at Khairani Road in the Saki Naka area on 9th Sept after allegedly being raped, has died during the treatment at a city hospital: Mumbai Police
— ANI (@ANI) September 11, 2021
‘बाप्पाने राज्य सरकारला हीच बुद्धी द्यावी की…’, फडणवीसांचे गणरायाला साकडे
“मी आता नि:शब्द आहे. यावर बोलायला शब्द नाहीत. ज्याप्रमाणे महिलेवर राक्षसी अत्याचार झाला. मी तिला बघून आले. अक्षरश: तिचे आतडे कापले गेले. प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला गेला. हे सगळे थांबायला पाहिजे. गेल्या ८ दिवसांत किती अत्याचार झालेत. ठाणे, अमरावती, पुणे आता साकीनाका! आपण काही करू शकलो नाही! आपले काही चालू शकले नाही. हे निश्चितपणे एका माणसाचे काम नाही,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
Mumbai: Man arrested for the alleged rape of a 30-year-old woman, case registered. The woman was found lying unconscious at Khairani Road in the Saki Naka area last night. She is currently under treatment at a city hospital: Police
— ANI (@ANI) September 10, 2021
‘तुमचा भुजबळ करू’ ही धमकी, आता त्यांना देता येणार नाही’
यावेळी, ‘राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नाही. राज्यातल्या महिलांवर घडणाऱ्या या अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी महिला अट्रोसिटीचा कायदा आणालाच पाहिजे. त्यासाठी या सरकारने कमिट्या स्थापन केल्याचं पाहिजेत,’ अशी मागणी करत, ‘कशाला हे खुर्चीवर बसले आहेत? या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला घेणंदेणं नाही. लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणताना घेताना. नाही वाचवू शकलो ताई तुला, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
Read Also :
- महाविकास आघाडी सरकार स्थिर की अस्थिर? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
- धनंजय मुंडे, करुणा शर्मांचे फोटो टाकून FB वर बदनामीकारक पोस्ट; फडणवीस, पवारांबद्दल अश्लिल ‘मजकूर’
- पन्नास वर्षे झाली, सत्ता शरद पवारांच्या घरात पाणी भरते; भाजप आमदाराची बोचरी टीका
- खासदार गिरीष बापटांचे वर्चस्व कमी करण्याचा घाट? भाजपचे नवीन शहर कार्यालय ‘राष्ट्रवादी’च्या शेजारीच
- ‘बंद करून दाखवले’ याचेही श्रेय घेणार का? नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र