मुंबई : संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून, संसदेचं कामकाज एकही दिवस सुरळीत झालं नाहीये. विरोधकांनी पेगॅसस आणि तीन कृषी कायद्यांसह, इतर मुद्द्यांवरुन सभागृहात गोंधळ घालत सरकारला धारेवर धरले. दरम्यान काल १२७ व्या घटना दुरुस्ती विधेयकानंतर मंजूर झाल्यानंतर, इन्शुरन्स बिल मांडायला संसदेत सुरवात झाली आणि विरोधकांनी विधेयकाची प्रत फाडून त्याचे तुकडे सगळीकडे फेकले. एकच गदारोळ उडाला आणि राज्यसभेत मार्शलला पाचारण करण्यात आले.
दरम्यान, यावरून आता विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला असून, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी, “संसदेत महिला सदस्यांना पुरुष मार्शलकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यावर राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांकडून चिंता व्यक्त केली आहे. मात्र, याप्रकरणी राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी केंद्राला जाब विचारायला हवा होता,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा अध्यक्ष और उपराष्ट्रपती जी ने इसपर चिंता जताई है। अगर वो चाहते तो सीधे सीधे सरकार का दोष बता सकते थे, लेकीन कुछ राजनैतिक वजहों से यह नही हो पाया – @nawabmalikncp
— NCP (@NCPspeaks) August 12, 2021
तसेच, “संसदेत अशा प्रकारच्या बळाचा वापर करून घटना घडणे, हे अशोभनीय असून, हा संसदेतील सर्व महिला सदस्यांचा अपमान आहे. लोकशाहीत अशाप्रकारची घटना घडणे उचित नाही,” या शब्दांत नाराजी व्यक्त करत, “संसदेचे कामकाज २ दिवसां आधीच स्थगित केले गेले. म्हणजेच केंद्र सरकार जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढत आहे,” अशी टीकाही त्यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही, “माझ्या ५५ वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी असं कधीच पाहिलं नाही,” अशी नाराजी व्यक्त केली आहे.
संसद में सदन के भीतर महिला सदस्यों को पुरुष मार्शलों ने धक्का मुक्की की, बलप्रयोग किया, यह बर्ताव पूरी तरह से अशोभनीय है। सदन की कार्यवाही बुधवार को अनिश्चितकाल तक के लिए स्थगित कर केंद्र सरकार ने चर्चा से भी भागने का काम किया है – @nawabmalikncp#MonsoonSession pic.twitter.com/iSwC3CrptB
— NCP (@NCPspeaks) August 12, 2021
“आम्हाला वाटले आम्ही हिंदुस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर आहोत, ही कसली लोकशाही?”
दरम्यान, “सदन व्यवस्थित चालवणे ही जबाबदारी सरकारची आहे. आता मार्शलना बोलावणे ही काही नवीन गोष्ट नाही, पण आमच्यासमोर महिला कमांडो उभ्या केल्या गेल्या, अशी कोणती मर्दुमकी तुम्हाला दाखवायची आहे?” असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला असून, विरोधकांनीही यावरून आक्रमक होत संसदेपर्यंत मोर्चा काढला, या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
Read Also :
- मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा; पत्नीनं केली तक्रार
- भाजप नेत्याच्या अकलेचे तारे; मोदींची तुलना केली थेट छत्रपती शिवाजीमहाराज आणि राजा शालिवाहन यांच्याशी
- कोरोनाकाळात ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा, पंतप्रधांनच सगळ्या मृत्यूंना जबाबदार
- “…एवढा थापाड्या मंत्री इतिहासात झाला नसेल,” पडळकरांचा वडेट्टीवारांवर जोरदार निशाणा
- “भिक मागा, भिक मागा भाजपवाले भिक मागा, वकिलांच्या फीसाठी भिक मागा,” पुण्यात शिवसेनेचे आंदोलन