मुंबई : अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता आणि पुण्यातील दुसऱ्या एल्गार परिषदेतील कथीत वादग्रस्त विधानप्रकरणी चर्चेत आलेला शरजील उस्मानी परत एकदा चर्चेत आला आहे.
यावेळी त्याला त्याने केलेलं ट्विट चांगलचं भोवलं असून, त्याच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी, जालना जिल्ह्यात एफआयआर नोंदवनाय्त आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, जालन्याच्या अंबड येथील रहिवासी असलेल्या आणि हिंदू जागरण मंचात काम करणारे कार्यकर्ते अंबादास अंभोरे यांनी उस्मानी विरोधात तक्रार दाखल केली आहे.
त्यांनी तक्रारीत म्हटले आहे, “उस्मानी यांनी ट्विटरवर नुकत्याच केलेल्या काही ट्विट्समध्ये भगवान श्री राम यांच्याबद्दल अयोग्य शब्दांचा वापर करून, त्यांचा अनादर केला आहे आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.”
दरम्यान, त्यांच्या या तक्रारीच्या आधारे अंबड पोलिसांनी उस्मानीविरोधात बुधवारी रात्री भारतीय दंड संहिता कलम 295-अ (धार्मिक भावनांना भडकावणारे द्वेषपूर्ण कृत्य) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला असून, हे प्रकरण जालना सायबर विभागात वर्ग करण्यात येईल, असे देखील पोलिसांनी सांगितले आहे.
Read Also :