मुंबई : दिल्लीतील निर्भया सारखीच संतापजनक आणि लाजिरवाणी अशी घटना मुंबईतील साकीनाका मध्ये घडली आहे. अमानुष अत्याचाराला सामोरे जावं लागलेल्या पीडितेवर, घटनेनंतर तीन दिवस मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते. अतिरक्तस्त्रावामुळे तिची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. मात्र आज अखेर मृत्यूशी सुरु असलेली तिची झुंज अपयशी ठरली असून तिचा दुर्दैवी अंत झाला आहे.
साकीनाका प्रकरणाने महाराष्ट्र हादरला, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे – चंद्रकांत पाटील
यांनतर यावर सर्व महत्वाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. “साकीनाक्यात घडलेला प्रकार आणि पीडितेचा झालेला मृत्यू मन सुन्न करणारा आहे. गेल्या महिन्याभराच्या काळात कितीतरी बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या घटना असुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या आहेत,’ असं मत त्यांनी व्यक्त केलं.
साकीनाका बलात्कार प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश
“साकीनाका, अमरावती, पुण्यातील ३ घटना, पालघर, नागपूर या सगळ्याच भयानक घटना आहेत. हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे. माणसं इतकी पाशवी असू शकतात?’ असा सवाल करत, ‘फास्ट ट्रॅक कोर्टात याची सुनावणी व्हावी,’ अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, सगळ्या आरोपींच्या मुसक्या आवळून, त्यांना फाशीच व्हायला हवी. मुख्यमंत्र्यांनी याची तात्काळ दखल घ्यावी, ‘ असं सांगत, ‘मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलात काय चाललंय याचीही माहिती घ्यावी,’ असा सल्ला त्यांनी दिला आहे.
‘महिला आणि बालविकासमंत्री असा विचार करतात, याची मला लाज वाटली!’
यावेळी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून सरकारवर हल्लाबोल करताना, “शक्ती कायद्यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. पण सध्याच्या कायद्यांचा वापर करूनही अशा केसेस फास्टट्रॅक कोर्टात चालवू शकतो. त्यामुळे, या प्रकरणात स्वत: मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची भेट घ्यावी आणि नराधमांना कठोर शिक्षा देण्याची विनंती करावी. सरकारने अनेक आश्वासने दिली पण त्यांना महिला आयोगाला अध्यक्ष दयायला फुरसत नाही,” असा हल्लबोल त्यांनी केला.
Read Also :
- ‘त्या’ दुर्दैवी घटनेचं राजकारण, म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार’
- मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा – नवाब मलिक
- ‘महाराष्ट्रातल्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका!’ चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया
- आतडे कापले, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला; मुंबईच्या साकीनाक्यातील बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी
- महाविकास आघाडी सरकार स्थिर की अस्थिर? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं