हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील उच्च पातळी बंधारे, बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला सहस्त्रकुंड जलविदुयत प्रकल्प आणि साठवण तलाव पूर्ण करून जिल्ह्यातील जलसिंचनाची कामे तात्काळ आणि प्राधान्याने पूर्ण करावीत, अशी मागणी राज्याचे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे हिंगोली खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे. मंत्री जयंत पाटील नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आयोजित आयोजित बैठकीत त्यांना जिल्ह्यातील विविध मागण्यांचे निवेदन देऊन मागण्या मंजूर करून घेण्यात आल्या.
“वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यँत लग्न करणार नाही, फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं?”
हिंगोली जिल्ह्याची सिंचन क्षमता अत्यल्प आहे, अनुशेष भरून काढण्यासाठी जिल्ह्यात उपसा सिंचन योजना मंजूर करणे गरजेचे आहे. मान्सून सुरवातीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील उच्च पातळी बंधारे आणि प्रलंबित जलविदुयत प्रकल्प पूर्ण करून साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास आगामी काळात याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल. हिंगोली जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा, येलदरी आणि सिद्धेश्वर हे मोठे प्रकल्प आहेत परंतू याचा लाभ जिल्ह्यास मिळत नाही. त्यामुळेच या प्रकल्पावर उपसा सिंचन योजना मंजूर करण्यात यावी आणि हिंगोली जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील जलसिंचनाची कामे प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
‘साहेब शिवसेना वाचवा, माझ्या मोठ्या साहेबांचा शिवसैनिक वाचवा’ कट्टर शिवसैनिकाने फोडला टाहो
ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पावरील उच्च पातळी बंधारे , कळमनुरी तालुक्यातील सापळी धरणाऐवजी नांदापूर,सालेगाव, डिग्रस, कोंढूर आणि कसबे धावंडा हे उच्च पातळीचे साखळी बंधारे मंजूर करावेत. कौठा तांडा, हिमायतनगर – सहस्त्रकुंड, किनवट येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बहुद्देशीय जलविदुयत प्रकल्प तात्काळ सुरू करण्यात यावा. तसेच हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पांगरा, साप्ती, गोजेगाव, बनचिंचोली, तर हिमायतनगर मधील घारापूर आणि किनवट तालुक्यातील माळेगाव या सहा उच्च पातळी बांधणाऱ्या मंजूरी देण्यात यावी, असेही मागणी त्यांच्याकडे करण्यात आल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले.
मी फडणवीसांना सन्यास घेवू देणार नाही, कारण…- संजय राऊत
पूर्णा प्रकल्पांतर्गत पूर्णा सिद्धेश्वर धरणाखाली पूर्णा नदीवर औंढा तालुक्यातील पोटा, वसमत तालुक्यातील जोड परळी, पिंपळगाव कुटे आणि परभणी जिल्ह्यातील ममदापुर येथे चार उच्च पातळी बंधारे बांधण्यात यावेत. तसेच हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस आणि सेनगाव तालुक्यातील सुकळी येथील साठवण तलावांना प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. यासह वसमत तालुक्यातील पिंपळखुटा व बोराळा येथील साठवण तलावाची कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत. हिंगोलीच्या लघु पाटबंधारे विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी आणि हिंगोली जिल्ह्यातील कायधु नदीवरील खरबी येथील उच्च पातळी बंधाऱ्याचे पाणी लिफ्ट करून इसापूर धरणात टाकण्यात येऊ नये तर ते पाणी हिंगोली जिल्ह्यातच वापरण्यात यावे याकरिता आग्रही भूमिका घेतली. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शंकरराव चव्हाण विष्णुपरी प्रकल्प मुख्य कालव्यावरील व वितरिके वरील देखभाल व दुरुस्तीची कामे तात्काळ हाती घ्यावीत तसेच माहूर तालुक्यातील धनोडा उच्च पातळी बंधाऱ्यास मंजूरी द्यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले.
Read Also :
- वडेट्टीवार म्हणाले, “ओबीसी असल्याने महसूल खातं मिळत नाही”, थोरात म्हणतात…
- …तर नगरमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर येणार राष्ट्रवादीचा महापौर? सुजय विखेंच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
- अजित पवार मुर्दाबाद..; सुप्रिया सुळेंसमोरच आंबील ओढ्यातील नागरिकांच्या जोरदार घोषणा
- मंत्र्यांनो हा ट्रॅक योग्य नव्हे…; क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त
- ‘साहेब शिवसेना वाचवा, माझ्या मोठ्या साहेबांचा शिवसैनिक वाचवा’ कट्टर शिवसैनिकाने फोडला टाहो