मुंबई : शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून महामारीविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांबद्दल दूरध्वनीद्वारे माहिती घेतली, तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असे देखील सांगितले.
दरम्यान, याचा आधार घेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी, ‘देवेंद्र फडणवीसजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोविड 19 चा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल, आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी की तुम्ही? असं ट्विट करत सणसणीत टोला लगावला. यावर आता भाजपकडून पलटवार केला गेला आहे.
‘स्वत:च उदोउदो करत फिरायचं., आगा ना पिछा बोलत रहायचं, अपयश आल की केंद्रावर ढकलायच, ही या राज्य सरकारची त्रिसूत्री, सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी कौतुक म्हणून मिरवायची आणि मुंबई हायकोर्ट जेव्हा म्हणते की जे नंदुरबारला जमले, ते मुंबईला का नाही? तेव्हा मूग गिळून गप्प बसायचं! अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर पलटवार करताना केली आहे.
स्वःताच उदोउदो करत फिरायच, आगा ना पिछा बोलत रहायचं, अपयश आल की केंद्रावर ठकलायच ही या राज्य सरकारची त्रिसूत्री, सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी कौतुक म्हणून मिरवायची आणि मुंबई हायकोर्ट जेव्हा म्हणते की जे नंदुरबारला जमले, ते मुंबईला का नाही? तेव्हा मूग गिळून गप्प बसायचं!..२
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 9, 2021
तसेच, ‘कोरोना कमी झाला की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आणि वाढला की जनतेचा निष्काळजीपणा! एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती? ‘आता घरीबसल्या मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं, या सारखं पंतप्रधानानी यांचं कौतुक केले, याचा नवा खेळ खेळला जातो, अशी टीका देखील त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
कोरोना कमी झाला की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आणि वाढला की जनतेचा निष्काळजीपणा! एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती?
आता घरीबसल्या मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं, सारखं पंतप्रधानानी यांच कौतुक केले, याचा नवा खेळ खेळला जातोय…३— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 9, 2021
‘मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता ते कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही आणि हे सांगतं कोण, तर मुख्यमंत्री कार्यालयाची प्रेसनोट! आता प्रत्येक बाबतीत PR agency वापरू नका, हेच तर देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या पत्रात म्हटले आहे, मग इतके झोंबले का? असा तिखट सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे.
मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता ते कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही आणि हे सांगतं कोण, तर मुख्यमंत्री कार्यालयाची प्रेसनोट!
आता प्रत्येक बाबतीत PR agency वापरू नका, हेच तर देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या पत्रात म्हटले आहे, मग इतके झोंबले का?
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 9, 2021
शिवसेनेचा संगत-गुण राष्ट्रवादीला लागला का कोण जाणे? पण टोपेंनी जालन्यात जास्त लस दिल्याबद्दल जो खुलासा मागितला, त्यावर जयंत पाटील यांनी बोलायला हवे. वास्तव माहिती लपवून पंतप्रधानांकडून कौतुक करून घेतल्याच दावा करताना ’मनाचा आतला आवाज’ तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकायला हवा.’ अशी बोचरी टीका त्यांनी मुख्यमंत्री आणि जयंत पाटील यांच्यावर केली आहे.
शिवसेनेचा संगत-गुण राष्ट्रवादीला लागला का कोण जाणे? पण @rajeshtope11 यांनी जालन्यात जास्त लस दिल्याबद्दल खुलासा मागितला, त्यावर @Jayant_R_Patil यांनी बोलायला हवे.
वास्तव माहिती लपवून पंतप्रधानांकडून कौतुक केल्याचा दावा करताना मनाचा ‘आतला आवाज’ तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकायला हवा…४ pic.twitter.com/7YHv8ROakQ— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 9, 2021
यावेळी त्यांनी सचिन सावंत यांचाही समाचार घेत, येथे बिचारे नितीन राऊत असो की पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात असो की अजून त्यांच्या पत्राचीही कुणी दखल घेत नाही तरी सचिन सावंत मात्र ‘बेगाने शादी में….’ नाचत राहतात. देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्राचा ‘लगता है निशाना सही जगह लगा है’, असा जोरदार टोलाही त्यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे.
येथे बिचारे @NitinRaut_INC असो की @prithvrj , @bb_thorat असो की अजून त्यांच्या पत्राचीही कुणी दखल घेत नाही तरी @sachin_inc मात्र ‘बेगाने शादी में….’ नाचत राहतात. @Dev_Fadnavis यांच्या पत्राचा ‘लगता है निशाना सही जगह लगा है‘
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 9, 2021
Read Also :
- सचिन सावंतांचा भाजपवर पलटवार, म्हणाले ‘मनोरा आमदार निवास’ची किंमत…
- “आगामी काळात काँग्रेस निवडणूक लढणार…”, नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
- “सांगा योग्य कोण? पंतप्रधान की तुम्ही?”, फडणवीसांना जयंत पाटलांचा थेट सवाल
- आरोग्यमंत्र्यांवर होतोय “हा” आरोप, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे चौकशीचे आदेश
- आदित्यला मंत्रिपद दिलं त्याच तत्परतेने बहुजनांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी