औरंगाबाद : मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरु झाल्यानंतर मंगळवारी पडलेल्या पावसाने हाहाकार उडालाय. कधी नव्हे ते एकाच दिवसात 182 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विभागात 150 ते 180 टक्के पाऊस झाला आहे. यात सर्वाधिक नुकसान नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात झालं आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर इथं काही लोक अडकलेत, त्यांना NDRF च्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पुणे महापालिकेच्या मामाराव दाते मुद्रणालयात दारुच्या पार्ट्या; सुरक्षा अधिकारीही सामील
नांदेड जिल्ह्यातील 54 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. बिलोली, मुखेड, कंधार, लोहा, ऊमरी या तालुक्यात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. मन्याड नदीला पूर आल्याने मुखेड बिदर मार्ग बंद झालेला आहे. गोदावरी नदीला पूर आल्याने गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विष्णुपुरी धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. परभणी जिल्ह्यातील पूर्णा नदीला पूर आल्याने त्याचं पाणी शेतीमध्ये घुसले. तर जालना जिल्ह्यातील भोकरदन, अंबड, बदनापुर तालुक्याला पावसाने रात्री अक्षरशः झोडपून काढले. गिरीजा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले.
मोठी बातमी! प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पुराच्या पाण्यात गेली वाहून
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, सोयगाव, सिल्लोड तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे वैजापूर तालुक्यातील नारंगी मध्यम प्रकल्प पूर्ण भरल्याने पाणी सोडण्यात आले. पूर्णा, खेळणा, अंभई, सोयगाव नदीला पूर आला. या पावसामुळे लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, परळी, धारूर तालुक्यातील सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन आता शेतकऱ्यांच्या हाताला लागेल की नाही याची शाश्वती राहिली नाही. बीड जालना औरंगाबाद जिल्ह्यात कापूस मका बाजरी पिकासह मोसंबीच्या बागांना या अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय. आता पिकाची परिस्थिती पुन्हा खराब झाली आहे.
धनंजय मुंडेंना पुढील 10 निवडणुकांमध्ये परळीत कोणीही रोखू शकणार नाही – जयंत पाटील
दोन आठवड्यापूर्वी मराठवाड्यात जवळपास साडेतीनशे महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झालं. मात्र त्याचे अद्याप पंचनामे पूर्ण झाले नाहीत. आता या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्यांचं जगणं अवघड करून टाकलंय. शेती पिकाचे झालेलं अतोनात नुकसान, घरांची पडझड, गुरंढोर वाहून गेली आणि घरात पाणी शिरल्याने होत्याचं नव्हतं झालं. अशात मराठवाड्यातील प्रत्येक गावातला माणूस मोडून पडल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे त्यांना आधार कोण देईल हा प्रश्न आहे.
Read Also :
- आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात, चार महिन्यात अर्धे मंत्री रुग्णालयात दाखल होतील – सोमय्या
- कात्रजचा खून झाला…; पुण्यातील बॅनरमुळे उडाली एकच खळबळ
- नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार; चिपी विमानतळाचं उद्घाटनं मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच
- काँग्रेसचे नेते मेले होते, उद्धव ठाकरेंनी यांना सत्तेत घेतलं म्हणून हे जिवंत – आमदार जैस्वालाच वक्तव्य
- तळेगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदरवारांची चाचपणी सुरू; महाविकास आघाडी पॅटर्न राबविणार का?