मुंबई : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसने तूर्तास तरी स्वबळाच्या नारा दिला असून, त्यावरून सत्तेतील इतर मित्रपक्षांमध्ये नाराजी वाढत असलेली दिसून येत आहे. मात्र, असे असले तरी, “स्वबळावर लढणे हाच पक्षाचा अजेंडा आहे,” असं भाष्य पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केलं आहे.
तसेच, काँग्रेससोबत २०१४ मध्ये धोका झाला, त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली. तसे पुन्हा होऊ नये, म्हणून आम्ही स्वबळाची तयारी सुरु केली असून, २०२४ मध्ये आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरणार आहोत. पक्षविस्ताराची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. मी हायकमांडच्या आदेशानं काम करणारा कार्यकर्ता आहे. पक्षश्रेष्ठीने दिलेली जबाबदारी मी प्रमाणिकपणे पार पाडत आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.
सूत्र : प्रशांत किशोर यांचं वक्तव्य, शरद पवार हे विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार!
यावेळी, “महाराष्ट्र हे काँग्रेसचंच राज्य आहे आणि आम्ही जी दिशा घेऊन काम करत आहोत, त्यावरुन राज्यात ‘काँग्रेस’ हीच नंबर १ ची पार्टी आहे, भविष्यात आणि येणाऱ्या २०२४च्या निवडणुकीत त्याचे परिणाम तुम्हाला नक्की पाहायला मिळतील,” असं म्हणत, “भाजपला आज देशात फक्त काँग्रेस पर्याय आहे. भाजप सरकारने देश विकायला काढला आहे. त्यामुळे, २०२४ला राहुल गांधींच्या नेतृत्वात केंद्रात सरकार तयार होईलच,” असा विश्वासही त्यांनी दर्शवला आहे.
कुणाच्याही नेतृत्वात लढा, भाजप ४०० पेक्षा अधिक जागा जिंकणारच – चंद्रकांत पाटील
दरम्यान, “शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीला मला आमंत्रण नव्हतं. मात्र ही बैठक ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका ठरवण्यासाठी होती, अशी माहिती बैठकीनंतर आमच्या नेत्यांनी मला दिली. त्यामुळे माझा राग वगैरे नाही. मी माझ्या पक्षाचं काम करत आहे, माझ्या पक्षाचं काम करताना जर कोणाला राग येत असेल, तर मला काही अडचण नाही”, असं म्हणत त्यांनी बैठकीला का उपस्थित नव्हतो, याचं स्पष्टीकरण दिलं. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीने राजकीय चर्चेला उधाण आलं होतं.
Read Also :
- “मुख्यमंत्र्यांनी शिक्षणाचा खेळ मांडून गुणवत्ता संपविण्याचा घाट घातला आहे”
- “पंकजा मुंडे समजूतदार, त्या कधीच बंडाचा विचार करणार नाहीत”- चंद्रकांत पाटील
- “तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ”, मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसला चिमटे
- “महाराष्ट्र हे काँग्रेसचंच राज्य आहे, २०२४ मध्ये काँग्रेसच नंबर एकची पार्टी”
- मोठी बातमी : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश?