गडचिरोली: आता नक्षलवादी संघटनेने मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनात उडी घेतली आहे. मराठा तरुणांनो दलाल नेत्यांपासून सावध राहा, आरक्षण हा खुळखुळा आहे. त्यात आपली शक्ती खर्च घालू नका. तसेच मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा, ते तुमच्यातील संघटित शक्तीला स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत आहे, अशा आशयाचे पत्रक भारताची कम्युनिस्ट पार्टी यांनी छापून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर नक्षलवाद्यांनी प्रथमच भुमिका उघड केली आहे.
मराठ्यांना आरक्षणासाठी लढावे लागणे म्हणजे देशावरील कृषी संकटाचा भाग आहे. आरक्षण कोणत्याही समाजाला न्याय-समानता देऊ शकला नाही. काळाच्या ओघात जसे अन्य समाजीतील नागरिकांमध्ये बदल होत आहे तसे बदल मराठा समाजातही होत आहे. स्वताच्या मेहनतीवर जगणारा शेतकरी समाज आज आरक्षणासाठी ओरडत आहे. ही समस्या म्हणजे देशीतील कृषी संकटाचेच लक्षण आहे. याला सरकारी धोरण जबाबदार, असेही पत्रात नमुद आहे.
सर्वच पक्षांच्या नेत्यांची नियत खोटी आहे. ते मराठा समाजाचे हीत कधीच साधणार नाही. त्यांचे गणित देन बाबींवर अवलंबून असते. मराठी समाज त्यांना केवळ वोट बँकेसाठी पाहीजे आहे. महाराष्ट्राच्या सत्तेवर जास्तीत जास्त काळ मराठा समाजातून आलेले नेते मंडळी राहिली आहे. असे असतानाही मराठा समाजाची अशी अधोगती का झाली, असेही पत्रकात नमुद आहे.
मराठा समाजाने शिवबांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये पुढाकार घेतला होता, आता पुन्हा एकदा पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मावळे बनावे लागेल. परत एकदा गनिमी काव्याचे डावपेच वापरावे लागतील. शत्रू, व्यवस्थेचे रखवालदार, साम्राज्यवादाचे दलाल सत्ताधारी वर्ग आहेत. मित्र, सर्वच समाजातील गोरगरीब जनता आहे. माओवादी मैदानात शस्त्र उचलून लढत आहेत. लक्ष्य, मार्ग, साधने तयार आहेत. मराठा समाजातील शिवाजी महाराजांचा खरा आदर्श बाळगणाऱ्या मावळ्यांना आवाहन आहे की, रयतेचे खरे राज्य आणण्यासाठी त्यांनी मैदानात उतरावे. आपल्या संघटित शक्तीला क्रांतीकडे वळवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमची वाट पाहत असल्याचेही नक्षली संघटनेने या पत्रकात म्हटले आहे.
Read Also :
- चिंतन, आढावा, बैठक नाहीच; नानांची वारी नेत्यांच्या घरी
- उच्च न्यायालयाने दिले आदेश, खासदार नवनीत राणांवर होणार मोठी कारवाई
- यंदाच्या आषाढी वारीचा वाद, तुषार भोसले भिडले थेट अजितदादांना म्हणाले…
- ‘वाघ हा वाघ असतो मग तो पिंजऱ्यातला असो की जंगलातला, महाराष्ट्रावर वाघाचे राज्य’
- ‘शिवसेनेला वचन पाळणारा मित्र म्हणणे ही पवारांची राजकीय हतबलता’