सोलापूर : काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. “महामारीच्या सुरुवातीच्या काळात ताटं वाजवायला लावल्यामुळेच आपल्या देशात अवदसा आली. या दरम्यान देशात महामारीमुळे झालेल्या मृत्यूला पंतप्रधानच जबाबदार आहेत. ते माध्यमांसमोर यायला घाबरतात. फक्त मतदानाच्या वेळी जनतेसमोर येतात, मतं मागतात. त्यांना लाजही वाटत नाही,” अशा शब्दात त्यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे.
“…एवढा थापाड्या मंत्री इतिहासात झाला नसेल,” पडळकरांचा वडेट्टीवारांवर जोरदार निशाणा
“पंतप्रधानांचं भूत सध्या वोटिंग मशीनमध्ये आहे. कोणत्याही पक्षाला मतदान केलं कि ते भाजपला जातं. त्यामुळे आधीसारखं हातावर शिक्का मारुन केलं जाणारं मतदानंच योग्य होतं. निवडणुकीसाठी बॅलेट पेपर प्रक्रिया मतदान परत आणण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत,” अशीही टीका त्यांनी केली आहे. त्यामळे, पंतप्रधानांवरच्या केलेल्या टीकेला भाजप काय प्रत्युत्तर देत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
“मराठा, धनगर समाजाप्रति भाजपाचं प्रेम ‘पुतना मावशी’चं” शिवसेनेनं भाजपावर टीकास्त्र सोडलं
दरम्यान, सोलापूर जिल्ह्याच्या उजनी धरणातील पाणी, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, त्यांच्या मतदार संघातील २२ गावांसाठी घेऊन जाणार होते, असा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी, शिंदे यांनी ‘प्राण जाये पर पाणी न जाये’, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. “सोलापूरकरांच्या हक्काचे उजनीतील एक थेंबही पाणी बाहेर नेऊन दिलं जाणार नाही,” अशी घोषणा त्यांनी केली होती.
Read Also :
- “भिक मागा, भिक मागा भाजपवाले भिक मागा, वकिलांच्या फीसाठी भिक मागा,” पुण्यात शिवसेनेचे आंदोलन
- “आम्हाला वाटले आम्ही हिंदुस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर आहोत, ही कसली लोकशाही?”
- महापालिका रणधुमाळी: सत्ताधारी भाजपचे कमळ पाण्यात बुडणार? २०२२ वाजणार घड्याळाची टिक-टिक!
- काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सोनिया गांधी संवाद साधणार, मुख्यमंत्री ठाकरेही होणार सामील
- देशमुखांच्या कंपन्यांचे अस्तित्व केवळ कागदावरच, ईडीच्या हाती आणखीनही महत्त्वाचे पुरावे