मुंबई : भारतामधील कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे, पण मृतांच्या संख्येत सातत्यानं वाढ पाहायला मिळत आहे. भारतात गेल्या 24 तासांत तीन लाखांपेक्षा कमी नवीन रुग्ण आढळले आहेत. पण मृताची संख्या चार हजारांपेक्षा जास्त आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत (रविवारी) भारतामध्ये 2 लाख 81 हजार 386 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी मृताच्या संख्येनं सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे.
India reports 2,81,386 new #COVID19 cases, 3,78,741 discharges and 4,106 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 2,49,65,463
Total discharges: 2,11,74,076
Death toll: 2,74,390
Active cases: 35,16,997Total vaccination: 18,29,26,460 pic.twitter.com/RJCDwbzyha
— ANI (@ANI) May 17, 2021
महाराष्ट्रात मृताची संख्या दिवसागणिक वाढतच आहे मागील 30 दिवसांत पहिल्यांदाच कोरोना रुग्णांच्या वाढीत मोठी घट पाहायला मिळाली. दररोज वाढणारी रुग्णसंख्या महिनाभरात पहिल्यांत तीन लाखांपेक्षा कमी झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं असले तरिही मृताच्या संख्येनं सर्वांची चिंता वाढली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी देशात 2.81 लाख रुग्ण आढळले आहेत. तर 4,106 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत तीन लाख 78 हजार 741 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन कोटी 49 लाख 65 हजार 463 इतकी झाली आहे.
देशात आतापर्यंत दोन कोटी 11 लाख 74 हजार 76 जणांनी कोरोनावर मात (Total discharges) केली आहे. देशातील एकूण कोरोना मृताची (Death toll) संख्या दोन लाख 74 हजार 390 इतकी झाली आहे. देशात सध्या 35 लाख 16 हजार 997 रुग्ण उपचाराधीन आहेत.
Read Also :
- देश सोडून पळाल्याच्या अफवांवर सायरस पुनावाला म्हणाले…
- … अन्यथा मी मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करेल, पडळकरांचे अजित पवारांना पत्र
- काँग्रेस नेत्यांनी ट्विटर प्रोफाइल बदलत पंतप्रधान मोदींना केला ‘हा’ सवाल
- ‘शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सैतानानो नरकात सुद्धा जागा मिळणार नाही’
- ‘अजित पवारांनी ‘कोव्हॅक्सिन’चा प्रकल्प विदर्भातून पुण्याला पळवला’