मुंबई : मुंबईत पावसाची जोरदार धार कोसळत आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबईची “तुंबई” झाली असून, यामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे दरम्यान, मुंबईमध्ये पावसाचे पाणी परत तुंबल्याने, मुंबई महापालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेवर भाजपने हल्लबोल केला होता. यातच, मालाड प. मालवणी भागात, गेट न. ८ इथे अब्दुल हमीद मार्गावरील ‘न्यू’ कलेक्टर कंपाऊंड भागात बुधवारी रात्री ११ च्या सुमारास इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यात ११ जणांचा मृत्यू झाला असून, यात ७ लोक जखमी लोकांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेवरुन देखील भाजपाने शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला असून, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना, भाजप नेत्यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ‘भाजपाला भौ-भौ करत राहू दे. ते अगदी दूध के धुले आहेत’ असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली होती. आता त्यांच्या या टीकेचा भाजपने समाचार घेतला असून, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत, “मा.महापौर किशोरी पेडणेकर यांचे हे वक्तव्य त्यांचे संस्कार आणि पक्षाची संस्कृती दाखवणारे आहे. महत्वाचे म्हणजे कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो हे लक्षात असू दे,” असा जोरदार निशाणा साधला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपचार घेत असलेल्या जखमींची बीडीबीए रुग्णालयात जाऊन विचारपूस केली असून, मृतांच्या नातेवाईकांना सरकारने ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेत मृत पावलेल्या लोकांना ट्विट करून आदरांजली वाहिली असून, त्यांनी मृतांच्या नातेवाईकांप्रति सहानुभूती व्यक्त केली आहे. या दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच, घटनास्थळी दाखल होऊन जवानांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आणि यात स्थानिक लोकांच्या मदतीने इमारतीच्या ढिगाऱ्याखली अडकलेल्या १५ हून जास्त लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
मा.महापौर @KishoriPednekar यांचे हे वक्तव्य त्यांचे संस्कार आणि पक्षाची संस्कृती दाखवणारे आहे. महत्वाचे म्हणजे कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो हे लक्षात असू दे. https://t.co/HnCmI1o1t2
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 10, 2021
Read Also :
- गोकुळने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम केले आहे; शरद पवार यांनी केली गोकुळची मनभरून प्रशंसा
- ‘भाजप अगदी ‘दूध के धुली’ आहे, त्यांना जे भुंकायचं आहे ते भुंकू देत’ – शिवसेना
- पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस; प्रत्यक्ष मदत कधी मिळणार? कुणालाच ठाऊक नाही
- ‘सरकारकडून माझ्या मागण्यांवर विचारही झाला नाही आणि कुणी किंमतही दिली नाही’ – संभाजीराजे छत्रपती
- “आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे” – चंद्रकांत पाटील