मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वात जास्त तडाखा हा राज्यातल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना आणि लगतच्या परिसराला बसला आहे. यामुळे कोकणवासीयांचे प्रचंड अर्थहीन नुकसान झाले असून, वादळामुळे राज्यात आत्तापर्यंत १९ जणांचे जीव गेले आहेत.
दरम्यान, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला. तसेच, राज्याचे राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील कोकण प्रदेशाचा तीन दिवसांचा दौरा करत, नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. तसेच, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले अनेक नेते कोकणमध्ये येऊन या जिल्ह्यांना भेट देऊन गेले.
यातच, आज राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मालवणच्या काही भागाला भेट देऊन नुकसानीची पाहणी करण्यासाठी जाताना, त्यांच्या गाड्यांचा ताफा संतप्त ग्रामस्थांनी अडवला. जिथे गरज आहे आणि ज्या भागाचे खरोखरच नुकसान झाले आहे, त्या भागांची पाहणी न करता, मंत्री भलत्याच भागाची पाहणी करून जात आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
तसेच, “आता इथून पुढे कोणत्याही मंत्र्याला या भागात फिरकू देणार नाही. आमच्या हाकाच ऐकून घेणार नसतील आणि नुसत्या दिखाव्यासाठी येणार असतील, तर अश्या मंत्रिमंडळाचा उपयोग तरी काय, असा तिखट सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचा कोकण दौरा हा खरचं इथल्या लोकांच्या मदतीसाठी केला जात आहे की त्यांच्या भावना दुखावून फक्त मदतीचा दिखावा करण्यासाठी केला जात आहे, असा सवाल यातून उपस्थित होऊ लागला आहे.
Read Also :
- एकाच दगडात दोन पक्षी मारणारे मलिक; आपल्याच सरकारला बदनाम करून घरचा आहेर देत आहेत
- अजितदादांनी आता स्वतःच कोकण दौरा करून, “दादा”स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत
- मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा लिपस्टिक नव्हे; नुसता “पावडर दौरा” होता
- भाजप युवा मोर्चाचे सचिव प्रदीप गावडेंना, आयटी ॲक्ट ६७ अंतर्गत पोलिसांनी घेतलं ताब्यात
- ‘ठाकरे सरकार वादळग्रस्तांसाठी खंबीरपणे उभे, पण फडणवीसांनी केंद्राकडून राज्याला मदत मिळवून दिली पाहिजे’