नागपूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी-युती करण्याचा अधिकार सेना प्रमुखांना आहे. मात्र, स्वबळावर लढण्याची वेळ आलीच तर युवा सेना सज्ज राहील असे सांगून युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई यांनी महाआघाडीतील घटकपक्ष काँग्रेसला अप्रत्यक्षपणे इशाराच दिला.
हे पण वाचा: “लोकशाही धोक्यात आली, ती वाचवली पाहीजे”च्या घोषणा देत काँग्रेसने दणाणून सोडले राजभवन
युवा सेनेच्या संवाद दौऱ्यासाठी ते बुधवारी नागपूरला आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत युवा सेनेचे मोर्चेबांधणी सुरू करायची असल्याने नागपूर शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी लगेच जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत खासदार कृपाल तुमाने, रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल, नागपूरचे संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, शहर प्रमुख नितीन तिवारी तसेच आदित्य शिरोडकर उपस्थित होते.
हे पण वाचा: कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, आमदार ऋतुराज पाटील भर पावसात पूरग्रस्तांच्या भेटीसाठी
युवा सेनेचा मुंबई आणि मराठवाड्याचा संवाद दौरा आटोपला. प्रत्येक भागात मोठा प्रतिसाद मिळत असून, कार्यकारिणीतही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील ॲक्टिव कार्यकर्त्यांना प्रमोशन दिले जाईल तर निष्क्रिय आहेत त्यांना बाजूला सारले जाईल. युवासेनेच्या बुथ आणि प्रभागनिहाय समित्याही स्थापन केले जातील. जे वादग्रस्त पदाधिकारी असतील त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली जाईल, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
हे पण वाचा: “बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो” हे पुणे आहे, हाताने हसू करु घेऊ नये!
विदर्भातील ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश लाभले आहे. हे आमच्यासाठी चांगले संकेत आहेत. उद्धव ठाकरे यांची देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरही राज्यातील नागरिक समाधानी असल्याचे दिसून येते. स्वच्छ प्रतिमा आणि त्यांचा स्पष्टवक्तपणा जनतेला भावला आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचेही सरदेसाई यांनी सांगितले.
Read Also :
- भाजप औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढणार काय? शिवसेनेचे जिल्हाभर संपर्क अभियान सुरु
- बीडीडी चाळीतील रहिवाशांना अखेर घर मिळणार’, जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा
- पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, महाराष्ट्रातील पूर परिस्थिचा घेतला आढावा
- “कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडताय” अनेकांनी व्यक्त केला संताप
- कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, आमदार ऋतुराज पाटील भर पावसात पूरग्रस्तांच्या भेटीसाठी