औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर रावसाहेब दानवे पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये आले आहेत. यावेळी करोना साथीच्या नियमांचं उल्लंघन करून कार्यकर्त्यांकडून त्यांचं, जल्लोषात रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आलं! हा सत्कार समारंभ उरकल्यानंतर त्यांनीही काही वेळ प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, बुलेट ट्रेनचा प्रस्ताव मार्गी लागला, तर मुंबई-औरंगाबादचं अंतर दीड तासावर आणि मुंबई-नागपूर अंतर तीन तासांवर येईल, असं सांगितलं.
सचिन वाझे यांच्यासोबत अनिल देशमुखांना एकाच कोठडीत राहावं लागेल – किरीट सोमय्या
ते म्हणाले, “मी रेल्वे मंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदा मराठवाड्यात आलो. कार्यकर्त्यांना अत्यानंद झाला. त्यांनी माझा सत्कार केला. मी त्यांच्या बळावर या पदापर्यंत येऊन पोहोचलो आहे. मी मराठवाड्यातल्या रेल्वेचे अनेक महत्वाचे प्रश्न सोडवणार आहे. नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन मार्ग तयार झाला, तर मुंबई-औरंगाबाद दीड तासात आणि नागपूरला ३ तासात पोहोचणे शक्य होईल. आता रेल्वेचे अधिकारी सादरीकरण तयार करत आहेत. मी गेल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल.”
बैलगाडा शर्यत चालू करा; पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
यावेळी त्यांनी, महाविकास आघाडी सरकारवर आरक्षणावरून टीका करताना, “भाजपने मराठा समाजाला आरक्षण दिलं. या सरकारमुळे ते रद्द झालं. पण आता सर्वाधिकार राज्याला दिले आहेत. त्याचा उपयोग करून गेलेलं आरक्षण पुन्हा मिळवून दिलं पाहिजे. पण आता त्यांनी नवीन टुमणं सुरु केलं आहे. ५० टक्क्याची कॅप उठावा. पण मग आजपर्यंत काँग्रेस सरकार होतं, त्यांनी ही कॅप का उठवली नाही?,” असा सवाल त्यांनी केला.
…तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही; पंकजा मुंडेची आक्रमक भूमिका
तसेच, कुठेही या सरकारला अपयश आलं; की जनतेचं लक्ष ते दुसरीकडे वळवण्यासाठी ते राज्यपाल आणि केंद्र सरकारवर टीका करतात. या सरकारने राज्यातील जातीय स्थिती बिघडवली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून जनतेची शुद्ध फसवणूक सुरु आहे. मराठा समाज या तीन पक्षांच्या अमर, अकबर, अँथोनी सरकारला माफ करणार नाही,” असा हल्लाबोल त्यांनी केला.
Read Also :
- राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे; संदीप देशपांडेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
- पुणे शहराला खड्ड्यात घालवून भाजपची खोटी बॅनरबाजी; राष्ट्रवादी स्पर्धेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांची पोलखोल करणार
- रोहित पवारांच्या पुढाकाराने खर्डा किल्ल्यावर फडकावला जाणार देशातील सर्वात उंच भगवा ध्वज
- ब्रेकिंग! अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, शेवटचा पर्यायही संपला?
- राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केलेल्या जातीयवादाच्या आरोपाला, शरद पवारांचे सडेतोड उत्तर