मुंबई : सध्या राज्यात भाजपच्या ‘जन आशीवार्द’ यात्रेवरून गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करत असून, नारायण राणेंच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातच आता पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर हल्लाबोल केला आहे.
एकनाथ खडसे यांच्यावरील होणारी ED ची कार्यवाही राष्ट्रवादीच्या फायद्याची; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट
“राज्यात भाजपच्या नवनिर्वाचित मंत्र्यांच्या यात्रा निघाल्या, पण त्यातला एक अतिशहाणा निघाला. याची यात्रा नव्हे, येड्यांची जत्रा सुरू आहे. त्यांनी पंतप्रधानांचा आदेश पाळला नाही. या अतिशहाणाल्याला कायद्याचा लगाम घालणं गरजेचं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी तो लगाम घातला,” असा जोरदार हल्लाबोल त्यांनी राणेंवर केला आहे. ते आज नाशिक दौऱ्यावर पक्ष कार्यक्रमासाठी होते, यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
नाशकात राजकीय भूकंपाची शक्यता; संजय राऊतांनी भाजपचा माजी उपमहापौर फोडला?
“राज्यात भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांनीही जनआशीर्वाद यात्रा काढली. पण कुणीही शिवसेनेवर, उद्धव ठाकरेंवर किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली नाही. पण एका अतिशहाण्याने मुंबई विमानतळावर उतरल्यापासून खालच्या शब्दांत टीका करायला सुरूवात केली . आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. आम्ही उगाच कुणाला अंगावर घेत नाही आणि कुणी आलं अंगावर तर सोडणार नाही,” असा इशारा देत, “मोदींनी नव्या मंत्र्यांना काय आदेश दिलेत ते मला जास्त माहितीये,” असं ते म्हणाले.
वरुण सरदेसाई आता परत आला तर माघारी जाणार नाही; नारायण राणेंनी पुन्हा ललकारले
यावेळी, “केंद्र सरकारची कामं लोकांपर्यंत पोहोचवा, सरकारच्या कामांचा प्रचार-प्रसार करा, असं मोदींनी सांगितलं आहे. पण एक अतिशहाणा हे आदेश न पाळता शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर टीका करत सुटला आहे. त्यांच्यामुळे भाजप रोज १० फूट मागे जातोय आणि लवकरच तो अर्ध्याफूटावर येईल”, असा टोला लगावत त्यांनी, नाशिकच्या शिवसैनिकांचं कौतुक केलं. “जिथं पोहोचायचा होता तिथं नाशिकचा आवाज पोहोचलेला आहे.” असं उद्गार त्यांनी काढले.
Read Also :
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीय, मी एकटा काय करू? – अण्णा हजारे
- पोलीस आणि गुंडांच्या जोरावर महाविकास आघाडी सरकार चाललंय – चंद्रकांत पाटील
- ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत – उद्धव ठाकरे
- देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा; शिवसेना- भाजपात नेमंक काय चाललयं?
- राणे-सेना संघर्षात चोख कामगिरी; पहिले मुख्यमंत्र्यांनी शाबासकी दिली, आता आदित्य ठाकरेंकडून बक्षीस