मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विख्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यातल्या भेटीने, राज्यसोबतच देशातल्याही राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीमागचे डावपेच काय असतील, यच्च जो तो आपापल्या परीने अंदाज लावून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
मात्र, येत्या काळात पंतप्रधान मोदींना शह देण्यासाठी आणि भाजपच्या देशातील वर्चस्वाला धक्का देण्यासाठी असलेल्या रणनीतीचाच हा देखील एक भाग असल्याची आणि त्याचे पहिले पाऊल शरद पवारांनी टाकले असल्याची ही खूण असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, यावर भाजपच्या राज्यातील नेत्यांकडून मात्र अगदी सूचक प्रतिक्रिया येत असून, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात एक ट्विट करून शरद पवारांना डिवचले आहे. त्यांनी, “२०२४ नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…”, असे खोचक ट्विट केले असून, शरद पवार-प्रशांत किशोर यांच्या या बहुचर्चित भेटीला भाजप खिचगणतीतही धरत नसल्याचेच दाखवून दिले आहे.
२०२४ नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 12, 2021
तसेच, याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या भेटीवर प्रतिक्रिया देताना, “कुणी कितीही रणनीती आखू द्या, आजही मोदी आहेत आणि २०२४ लाही मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचीच सत्ता असेल,” असे रोखठोक विधान केले होते. यानंतर अतुल भातखळकर यांनीदेखील हे विधान करून अप्रत्यक्षपणे नाव न घेता शरद पवारांकडेच बोट केले आहे.
Read Also :
- भाजपला मोठा धक्का! एकाच वेळी १५ नेत्यांचा पक्षाला रामराम
- मुख्यमंत्र्यांनी “अब मेरे साथ दो और साथी” म्हटल्यावर, पंतप्रधानांनी लगेच वेळ दिली
- २०२४ च्या निवडणुकीत जयंत पाटलांना घरी पाठवू – चंद्रकांत पाटील
- नक्षलवाद्यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा, छत्रपती संभाजीराजेंनी दिली प्रतिक्रिया
- मुख्यमंत्रीपद पाच वर्षे शिवसेनेकडेच राहणार; राऊतांचा मोठा खुलासा