मुंबई : साकीनाका परिसरात घडलेल्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या बलात्काराच्या घटनेनंतर राज्यातील महिला आणि विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, त्यांनी सरकारकडे या पार्श्वभूमीवर, महिलांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ योग्य ती पावलं उचलण्याची आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृतींना आळा बसण्यासाठी कठोर कायदे लागू करण्याची मागणी केली आहे. त्याच अनुषंगाने आज मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली.
परप्रांतीयच अशा प्रकारचे गुन्हे करतात का? महाराष्ट्रातील माणूस करत नाही का?
यावेळी त्यांनी गृहमंत्र्यांना एक निवेदन दिलं आहे. त्यात, ‘पुरोगामी महाराष्ट्र अशी ओळख सांगणाऱ्या आपल्या राज्याची राजधानी मुंबईमधील साकीनाका येथे घडलेल्या घटनेतील आरोपीने क्रौर्याची परिसीमा गाठली. गेल्या काही दिवसांत बलात्कार, मारहाण, हत्या, लैंगिक शोषण अश्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. ‘महिलांसाठी सुरक्षित’ अशी ओळख राज्य गमावून बसते काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याला बहुतांश परप्रांतीय विकृत मानसिकतेची लोकं जबाबदार आहेत,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
यांनतर त्यांनी मनसेकडून १० महत्वाच्या मागण्या केल्या आहेत…
- साकीनाका बलात्कार घटनेतील आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडित महिलेला त्वरित न्याय द्यावा.
- महिलांवरील बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनेत २४ तासांच्या आत महिलेचा जबाब नोंदवून घेणं बंधनकारक करावे.
- पोस्को सारख्या गंभीर गुन्ह्याअंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल होऊनही, कायद्यातील पळवाटा शोधून अनेकजण उजळ माथ्याने फिरताना दिसतात. त्यासाठी कायद्यातील पळवाटा दूर करून, पोलिसांनी जलदगतीने आणि अचूक आरोपपत्र मांडावे.
- महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘शक्ती कायदा’, हिवाळी अधिवेशनात पटलावर ठेवून संमत करावा.
- राज्य महिला आयोगाला अध्यक्ष पद शक्य तेवढ्या लवकर द्यावे, अशी आमची आग्रही मागणी आहे.
- बलात्काराच्या घटनेसाठी जबाबदार असलेल्या एखाद्या आरोपीला फासावर चढवण्याचे धारिष्ट्य सरकारने दाखवावे, जेणेकरून अशा लोकांच्या मनात कायमस्वरूपी जरब बसेल.
- महिलांवरील अत्याचाराची वाढती प्रकरणे पाहता, आपण स्वतः जातीने पुढाकार घेऊन या प्रकरणाचा किमान महिन्यातून एकदा स्वतः आढावा घ्यावा अशी आमची मागणी आहे.
- चित्रपटसृष्टीत महिला कलाकारांना काम मिळवून देण्याचे, आमिष दाखवून महिला नवोदित कलाकारांवर अत्याचार करण्याचे प्रमाण वाढले असून, यावरही कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
- बहुतेक बेकायदेशीर घटनांमध्ये परप्रांतीय गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आरोपी म्हणून सापडत आहेत. त्यांना जरब बसावी यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे. जेणेकरून असे कृत्य करण्यापूर्वी आरोपीच्या मनात भीती निर्माण होईल.
राज्यातील ‘असुरक्षित’ सावित्रीच्या लेकींसाठी अखेर मुख्यमंत्री आले धावून
‘एक जबाबदार, कर्तव्यकठोर आणि प्रामाणिक मंत्री अशी आपली समाजात ओळख आहे. आपण यापूर्वी घेतलेले अनेक निर्णय राज्यासाठी पथदर्शी ठरले आहेत. अशात आपल्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात साकीनाक्यासारखी घटना घडणे हे निश्चितच भूषणावह नाही. त्यामुळेच आम्ही केलेल्या सर्व मागण्यांचा आपण पूर्ण विचार कराल, आणि महिलांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी सर्व स्तरातील पोलीस अधिकाऱ्यांना उचित निर्देश द्याल हीच अपेक्षा बाळगते.’
महिलांची सुरक्षा कशी करणार? मुंबई पोलीस आयुक्तांनी दिल्या १० महत्त्वाच्या सूचना
दरम्यान, यांनतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी, राज्यात महिलांवर अत्याचार करणाऱ्यां गुन्हेगारांत ८० % परप्रांतीय गुन्हेगार आहेत. याची सर्वात आधी राज ठाकरे यांनी दखल घेऊन, परप्रांतीयांच्या नोंदणीचा मुद्दा मांडला होता. त्याचा मुख्यमंत्र्यांनी विचार केल्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो आणि राज ठाकरे यांच्या या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. त्याचं आम्ही स्वागत करतो,’ असं त्या म्हणाल्या.
Read Also :
- 48 तासात दरेकरांनी माफी मागावी, अन्यथा दिसेल तिथे गाठून तोंड काळ करू – राष्ट्रवादी आक्रमक
- …तर मी पदाचा राजीनामा देतो; मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
- हसन मुश्रीफांना कोणी ओळखत नाही, पेपरमध्ये बातमी यावी म्हणून, माझ्यावर आरोप करतात – समरजीत घाटगे
- ‘…तर महाराष्ट्रावर येऊ शकतं अंधाराचं राज्य!’, ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिला इशारा
- पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा होणार; ठाकरे सरकारविरोधात उद्या भाजपचे राज्यभर आंदोलन