मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या आहेत. एकीकडे या निवडणुका आरक्षण पूर्ववत मिळवून दिल्याशिवाय घेऊच नका! अशी भूमिका सर्व पक्षांनी जाहीर केली असली, तरी दुसरीकडे मात्र वैयक्तिक पातळीवर प्रत्येक पक्ष निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष मोर्चेबांधणीला आणि तयारीला लागला आहे. त्यामुळे, या निवडणुका होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
किरीट सोमय्या पुण्यात करणार गौप्यस्फोट, दुपारी 3 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद
दरम्यान, निवडणूक आयोगाने मात्र अजून एका निवडणुकीची घोषणा केली असून, राज्यसभेच्या रिक्त जागांवर आता महाराष्ट्रा सह तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, मध्यप्रदेश अशा एकूण सहा जागांवर पोटनिवडणूका होणार असल्याचे आयोगाने सांगितले आहे. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी यासंबंधीची मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्याच दिवशी निकाल देखील जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे, राज्यात या मानाने का होईना, निवडणुकीचे पडघम वाजले आहेत.
Election Commission of India to hold Rajya Sabha bypolls for six seats – one each in West Bengal, Assam, Maharashtra & Madhya Pradesh & two seats in Tamil Nadu on October 4
Bypolls for an Assembly Council seat in Bihar to be held on October 4 pic.twitter.com/wj2AU0l7yv
— ANI (@ANI) September 9, 2021
ज्या राज्यसभेच्या एकूण ६ रिक्त जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेचा समावेश असून, म.प्रदेशातील एका जागेचा, प.बंगालमधील एका जागेचा, तमिळनाडूमधील २ रिक्त जागांचा समावेश आहे.
पुरामुळे घर वाहुन गेले, शेतातील पीके उद्ध्वस्त झाली, आम्ही कसं जगायचं; हवालदिल शेतकऱ्याच्या व्यथा
राज्यातील काँग्रेस दिग्गज नेते खासदार राजीव सातव यांचं काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळं निधन झालं. त्यामुळे, आता काँग्रेससाठी ही निवडणूक महत्त्वाची असून, त्यांच्या निधनामुळे गुजरात काँग्रेस प्रभारी पदी कोणाची नेमणूक होणार आणि राज्यसभेतील सदस्यत्व कुणाला मिळणार, याकडे काँग्रेसमधील नेते मंडळींचं जास्त लक्ष असणार आहे.
Read Also :
- एकनाथ खडसे सध्या सत्ताधारी गटात असले तरी गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते – ED
- भाजपा करुणा शर्मा यांच्या पाठीशी; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
- शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला; कोणत्या मुद्यांवर चर्चां होणार, राजकीय तर्कवितर्कांना उधान
- तडस यांच्या कौटुंबिक वादाला नवे वळण, गंभीर आरोपानंतर आता वादावर पडदा पडणार?
- पुण्यात उद्यापासून संचारबंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार