मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर, मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर नाराजी आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे. तसेच, आत्तापर्यंत या प्रश्नावरून सामंजस्याची भूमिका घेणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी देखील ठाकरे सरकारसमोर मांडलेल्या ५ मागण्यांसाठी, सरकारला ६ जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार आता चांगलेच अडचणीत सापडले आहे.
दरम्यान, आज ते तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी, पत्रकारांशी बोलताना परत एकदा ठाकरे सरकारला इशारा दिला असून, “मला त्यांनी मला कोविड योद्धे म्हणून बाहेर पडण्याचा सल्ला देत आहेत, पण मी आधीपासूनच समाजाचा योद्धा आहे. त्यांना मी कोविड योद्धा म्हणून बाहेर पडावं असं वाटत असेल, तर त्यांनी माझ्या ५ मागण्या आधी पूर्ण कराव्यात,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे.
माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही.
पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 31, 2021
यातच आता त्यांनी एक खळबळजनक ट्विट केले असून, “सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?,” असा सरळ सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.
तसेच, “मराठा आरक्षणाच्या लढ्यात मी सदैव समाजा सोबत..! एक मराठा.. लाख मराठा..! मराठा आरक्षणाच्या प्रश्नी आजपासून मी महाराष्ट्राचा दौरा करत आहे. यावेळी अनेक लोकांना भेटणार असलो तरी, बहुतांश लोकांना इच्छा असूनही भेटता येणार नाही,” असं देखील त्यांनी ट्विट करून सांगितले आहे.
ठाकरे सरकारला अल्टिमेटम, या ५ मागण्यांचा ६ जून पर्यंत निकाल लावा अन्यथा…
संभाजीराजेंनी ठाकरे सरकारसमोर खालील ५ मागण्या ठेवल्या आहेत. या ५ मागण्यांचा निकाल येत्या ६ जूनपर्यंत मार्गी न लावल्यास त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी रायगडवरून मराठा समाज आंदोलनाचा एल्गार करेल, असा थेट इशारा दिला आहे.
- न्यायालयाने आदेश दिल्यानुसार मराठा समाजातल्या मुला-मुलींच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावा! नियुक्त्यांना आरक्षण द्या!
- ‘सारथी’ला १००० कोटींचा निधी द्या! सारथीला नुसती जागा देण्याऐवजी तिला स्वायत्तता द्या! सारथीचं प्रतिनिधित्व मराठा समाजाला करू द्या! नाहीतर सारथीतुन शाहू महाराजांचं नाव काढून टाका!
- मराठा समाजातील छोट्या व्यावसायिकांना संजीवनी ठरलेल्या ‘अण्णासाहेब महामंडळा’ला निधी वाढवून, त्याला नवंसंजीवनी द्या!
- मराठा समाजातील विध्यार्थी आणि विद्यार्थिनींचा राहण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक वसतिगृह उभारण्याचा निर्णय घ्या!
- ३०% धनिक मराठा समाज सोडून उर्वरित ७०% हा गरीब आणि वंचित मराठा समाज आहे. या उर्वरित मराठा समाजालादेखील बहुजन समाजासारखं आरक्षण द्या!
Read Also :
- सात वर्षे निव्वळ स्वप्ने दाखवली, पण एकही पूर्ण केलं नाही
- मुख्यमंत्र्यांची तंबी! गर्दी कराल तर याद राखा, कडक निर्बंध लावले जातील
- मराठा समाजाला आघाडी सरकारकडून मोठा दिलासा, मराठा तरुणांना मिळणार EWS मध्ये 10 % आरक्षण
- मी मोदींवर नाराज नाही, त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला!
- गुजरातला हजार कोटींची मदत केलीत, महाराष्ट्राला तुम्हाला वाटत असतील तेवढे तरी द्या!