मुंबई : शुक्रवारी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने, तसेच औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आले असता, मंचावर उपस्थित भाजपच्या नेत्यांकडे पाहून त्यांनी, “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी” असं म्हटलं. त्यानंतर त्यांच्या या विधानावरून राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ उडाला असल्याचे दिसून येत आहे.
कुणीही कायमचा शत्रू नाही, काहीही चमत्कार होऊ शकतो!
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर आता राष्ट्रवादीचे काही नेते नाराज असल्याच्या चर्चा असून, यांनतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ गाठल्याने नाराजीच्या चर्चांना आणखीनच उधाण आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबतच्या तासाभराच्या बैठकीनंतर बाहेर आल्यावर राऊत यांना याबाबत विचारले असता, ‘मुख्यमंत्र्यांचं विधान अचानक नाही, तर जाणीवपूर्वक होतं. त्यामुळे, महाविकास आघाडीत कुठलाही वाद पेटलेला नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री म्हणाले ‘भावी सहकारी’, आज फडणवीस-जयंत पाटील एकाच गाडीत!
‘सर्वत्र शांतता आहे. आत सगळं आलबेल आहे. कोणाला आनंदाच्या उकाळ्या फुटत असतील, तर फुटू द्या. महाविकास आघाडीत कसलंही वादळ नाही. पण, आत झालेली चर्चा बाहेर का सांगू? असं म्हणत त्यांनी चर्चेचा विषय गुलदस्त्यात ठेवला आहे. ‘अनेक माजी सहकाऱ्यांना भावी व्हायचे आहे. त्यांना हा सूचक इशारा होता,’ असं त्यांनी सांगितलं. ‘मुख्यमंत्र्यांशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. गणेशोत्सव आहे. उद्या विसर्जन आहे. त्यामुळे गणपतीचं दर्शन घेतलं,’ असं त्यांनी सांगितलं.
दिवाळीपूर्वीच देशमुख तुरुंगात जाणार, मग नंबर…सोमय्यांचा नवा दावा
तसेच, ‘चंद्रकांत पाटलांनी २ दिवसांची मुदत दिली होती. ती आता संपली आहे. २ दिवसात काहीतरी होईल असं ते म्हणाले होते. मला वाटतं आहे, आता त्यांना एक्सटेंन्शन द्यावं लागेल,’ असा चिमटा त्यांनी काढला, तर मोदी-ठाकरे कुटुंबांचे संबंध फार जुने आहेत, ते चांगले आहेत. ते तसेच राहतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे, ‘पंजाबमध्ये जे घडत आहे, तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर बोलण्याची आवश्यकता नाही,’ असे ते म्हणाले.
Read Also :