मुंबई: कोकणात जोरदार पावसाने आणि त्यामुळे आलेल्या पुराने, झालेल्या दुर्घटनांनी होत्याचं नव्हतं झालंय. कोकणची साधी भोळी माणसं उन्मळून पडलीत. कालपर्यंत समृद्ध असणारी माणसं आज संकटात सापडलीत. रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४० लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली. आपत्तीग्रस्तांना पुनर्वसनासाठी आर्थिक स्वरुपात तातडीने मदत करावी अशी मागणी राज्य सरकारकडे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
हे पण वाचा: ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका, तिथे समुद्राच्या लाटा थांबवणार ठाकरे सरकार
या आपत्तीग्रस्तांना राज्य सरकारने तातडीने आर्थिक स्वरुपात मदत द्यावी. सरकारने या संकटाच्या परिस्थितीत केवळ इच्छाशक्ती दाखवून चालणार नाही. तर आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा सर्व पूर्वपदावर झाल्यानंतर सरकार वरातीमागून घोडे नाचवणार असेल, योजनांवर भर देणार असेल, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.
अतिवृष्टीमुळे दरडीखाली सापडलेल्या पोलादपूर तालुक्यातील सुतारकोंड व महाड तालुक्यातील तळीये गावातील आपत्तीग्रस्त रुग्णांना मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, आज त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. pic.twitter.com/1izVWajaQn
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 26, 2021
हे पण वाचा: नारायण राणे पांढऱ्या पायाचे म्हणूनच कोकणावर संकट, मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर
दरेकर यांनी आज अतिवृष्टीमुळे दरडीखाली सापडलेल्या पोलादपूर तालुक्यातील सुतारकुंड आणि महाड येथील तळीये गावांमधील रुग्णांची मुंबईतील जे.जे. रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली. त्यावेळी संबंधित डॉक्टरांना रुग्णांची अधिक काळजी घेण्याबाबत त्यांनी सूचनाही दिल्या. त्याचबरोबर कुठलीही मदत आवश्यक असल्यास भाजप आपल्यासोबत असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी तळीये आणि सुतारकुंड गावातील जखमी रुग्णांना दिलं.
हे पण वाचा: ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका, तिथे समुद्राच्या लाटा थांबवणार ठाकरे सरकार
तळीये गावातील जखमींची जे.जे. रुग्णालयात विचारपूस
भेदरलेल्या मनस्थितीमध्ये असलेल्या लोकांना आधार आणि दिलासा देण्याची गरज आहे. जे. जे. रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांची परिस्थिती काय आहे? त्यांच्यासाठी उपाययोजना काय आहे? हे पाहण्यासाठी आलो. आज ते बेडवर असतानाही त्यांना भविष्याची चिंता लागून राहिली आहे. हे जखमी लोक सध्या मानसिकदृष्ट्या कमकुवत झाले आहेत, असं दरेकर यावेळी म्हणाले.
Read Also :
- नारायण राणे पांढऱ्या पायाचे म्हणूनच कोकणावर संकट, मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर
- ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका, तिथे समुद्राच्या लाटा थांबवणार ठाकरे सरकार
- “राज ठाकरेंचा मलाही फोन”, भाजपच्या बड्या नेत्याचा खुलासा; राज-भाजप भेटीची तारीख ठरली?
- राज्यातल्या भाजपच्या “या” मोठ्या नेत्याचा, झारखंड सरकार पाडण्याच्या कटात हात!
- “कुठेही गेलं तर जनतेचं ऐकून घ्यायचं असतं”, राष्ट्रवादीकडून शिवसेनेला घरचा आहेर