उत्तरप्रदेश निवडणुकीची रणधुणाळी सुरू झाली असतानाच भाजपला एक मोठा झटका बसला आहे. उत्तरप्रदेशातील योगी सरकारमध्ये मंत्री असलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय जनत पक्षाला रामराम करत स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी 2017 मध्ये भाजपत प्रवेश केला होता आणि पडरौना विधानसभा क्षेत्रातून ते विजयी झाले होते. पडौरना मतदारसंघातून ते सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाले आहेत.
कर्मचाऱ्यांनो, एसटी पूर्वपदावर आणा, तुमच्या सर्व मागण्या मान्य करू; शरद पवारांचे आवाहन
अखिलेश यादव यांची भेट घेऊन स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. स्वत: अखिलेश यादव यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. अखिलेश यादव यांनी एक फोटो ट्विट करत म्हटलं, “सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणारे लोकप्रिय नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्यासोबत समाजवादी पक्षात आलेले इतर नेते, कार्यकर्ते या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा.”
खेड प्रस्तावित विमानतळ : आमदार महेश लांडगेंच्या आवाहनाला शिरुरच्या आजी-माजी खासदारांची उत्तर !
सामाजिक न्याय और समता-समानता की लड़ाई लड़ने वाले लोकप्रिय नेता श्री स्वामी प्रसाद मौर्या जी एवं उनके साथ आने वाले अन्य सभी नेताओं, कार्यकर्ताओं और समर्थकों का सपा में ससम्मान हार्दिक स्वागत एवं अभिनंदन!
सामाजिक न्याय का इंक़लाब होगा ~ बाइस में बदलाव होगा#बाइसमेंबाइसिकल pic.twitter.com/BPvSK3GEDQ
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) January 11, 2022
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वाी प्रसाद मोर्य यांच्यासोबत मंत्री धर्म सिंह सैनी आणि इतर चार आमदार सुद्धा समाजवादी पार्टीत प्रवेश करु शकतात. भारतीय जनता पक्षाचे मंत्री दारा सिंह चौहान हे सुद्धा पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
Read also:
- मुंबई महानगरपालिका म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कमाईचे साधन – किरीट सोमय्या
- …कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहेत – पंकजा मुंडे
- “पवारांना बैठका घ्यायचाच असतील, तर मुख्यमंत्री त्यांनाच चार्ज का देत नाहीत?”
- पुण्यात भाजपला धक्का, 18 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला?
- पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला; भुजबळांचा पडळकरांना खडा सवाल