डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील निवासस्थान राहिलेल्या ‘राजगृह’ची मंगळवारी रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली होती. घराच्या काचांवर दगडफेक केली आणि कुंड्यांचे नुकसान करण्यात आले होते. पोलिसांना सीसीटिव्ही फुटेज देण्यात आले असून, पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
तसेच, आता राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काल झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. तोडफोड झाली त्यावेळी प्रकाश आंबेडकर अकोला येथे होते. रिपाइं नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत.
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 8, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. दोषींवर कडक कारवाईचे करण्याचे आदेश दिले असल्याचे म्हटले आहे.