हिंगोली : वेदांत आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधी पक्षाकडून शिंदे सरकारवर सडकुन टिका केली जात आहे. 1 लाख तरूणांनी रोजगार देणारा प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारने गुजरातला कसा जाऊ दिला असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावरून युवासेना नेते वरूण देसाई यांनी राज्यातील सर्व तरूणांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा मागितले पाहिजे, असं म्हटले आहे.
“मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या पत्राचा विचार करावा”; सुप्रिया सुळे
उद्योगमंत्री स्वत: म्हणतात, मला याची कल्पनाच नाही. दीड लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट राज्यातून निघून जाते. 1 लाख नोकऱ्यांची संधी इथून निघून जाते आणि उद्योगमंत्री म्हणतात, मला याची कल्पना नाही. अश्या उद्योगमंत्र्यांचा तरूणांनी राजीनामा मागितला पाहिजे, असं वरूण देसाई म्हणाले.
“ही वेळ ‘एकदम ओक्के’ म्हणण्याची नसून कृती करण्याची आहे”; राष्ट्रवादीने शिंदेंना फटकारलं
सरकारने बेरोजगारी हटवण्याऐवजी, केवळ पक्ष मजबूत कसा होईल, कुणाला किती खोके दिल्यावर ते आपल्याकडे येतील, कोणतं सरकार पाडता येईल, याकडे सगळा फोकस आहे. त्यामुळे तरूण काय करत आहेत. याकडे दुर्लक्ष होत आहे. स्वतः साठी खोके…महाराष्ट्राला धोके, असा आरोप वरूण देसाई यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.
हा प्रकल्प राज्यात का आला नाही? यावर योग्य उत्तर अपेक्षित होतं. केंद्र सरकार आणि राज्य सरकारची मिळून थोडी सांगड घालायची गरज होती. जून महिन्यापर्यंत आम्ही फॉलोअप घेतला. महाराष्ट्रातल्या 1 लाख तरूणांना नोकऱ्या मिळणार नाही, याची जबाबदारी कोण घेणार. तळेगावमधील हा प्रकल्प गुजरातला कसा गेला, असा सवाल आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला केला आहे.
Read also
- “पहिल्याच अधिवेशनात दिलेले वचन मुख्यमंत्री पूर्ण करत नसतील तर..;” राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- “वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यामागे मोदी नाहीत”; वेदांतच्या अध्यक्षांचे स्पष्टिकरण
- “शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार, जर परवानगी मिळाली नाही तर..;”गुलाबराव पाटील
- “रशियावरून फडणवींसांचा फोन आला अन्…मला सांगितलं की..”; सांमंताचं वेदांत प्रकल्पावर मोठं वक्तव्य
- “देवाचा कौल घेऊन भाजपात प्रवेश केला”; गोव्यातील काॅंग्रेस आमदाराचं वक्तव्य