कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविरूद्ध ट्विटर युद्ध सुरू केले आहे. राहुल यांनी शुक्रवारी सांगितले की 2014 पासून पंतप्रधान सतत मोठ्या चुका करत आहेत. यामुळे देश कमकुवत झाला आणि लोक संकटात सापडले.
यामध्ये राहुल गांधी यांनी तीन प्रश्न उपस्थित केले आहे. अतिक्रमणासाठी चीनने याच वेळेची का निवड केली? ,भारतामध्ये अशी कोणती परिस्थिती आहे ज्यामुळे चीनला आक्रमक होण्याची संधी दिली? या क्षणी असे काय विशेष आहे, ज्याने चीनला खात्री पटली की ते भारताविरूद्ध हिम्मत करू शकतात? असे प्रश्न राहुल गांधी यांनी मोदींच्या विरोधात उपस्थित केले आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की हे समजून घेण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या बाजू समजून घ्याव्या लागतील. देशाचा बचाव एका पॉइवर अवलंबून नसतो, तर हे काम अनेक ताकदींच्या संयोजनावर असते. हे कोऑर्डिनेशन अनेक व्यवस्थांचे असते. देशाचे संरक्षण हे, विदेशी संबंधांद्वारे, शेजारी देशांनी, अर्थव्यवस्थेद्वारे आणि लोकांच्या भावनांनी होत असते. त्या सर्व क्षेत्रात भारताला त्रास सहन करावा लागला आहे आणि संकट वाढले आहे.
Since 2014, the PM's constant blunders and indiscretions have fundamentally weakened India and left us vulnerable.
Empty words don't suffice in the world of geopolitics. pic.twitter.com/XM6PXcRuFh
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 17, 2020