दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शहरातील नगर-मनमाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करून सरकारमधील मंत्रीच दूध दरवाढ करण्यास विरोध करीत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. “दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करा अन्यथा शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर येऊन धडकेल”, असा इशारा माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले,”महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व राज्यात कुठेही नाही, मुख्यमंत्री फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात व्यस्त आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही पण मंत्र्यांसाठी गाडय़ा खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल उपस्थित करतानाच सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही, तुम्ही जनतेच्या मनातून केव्हाच पडले आहात, आता केवळ बैठकांचा फार्स करू नका. दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करा अन्यथा शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर येऊन धडकेल”