कोलकाता : संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या प. बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने, भाजपचा दारुण पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. प.बंगालमध्ये भाजपनं आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती, मात्र तिथे भाजपाला केवळ ७७ जागाच मिळाल्या, तर दुसरीकडं ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला आत्तापर्यंतच्या सर्वात जास्त २१३ जागा मिळाल्या आहेत
दरम्यान, बंगालमध्ये तृणमूलची सत्ता आल्यानंतरच्या २४ तासांतच राज्यात, हिंसाचाराच्या घटनांना बळ मिळाले असून, आत्तापर्यंत भाजपच्या ९ कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. यामुळे बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले असून, भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते निवडणुकांनंतर परत एकमेकांशी भिडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या ठिकाणी तणमूल कांग्रेसला लक्ष्य करत भाजपनं २०० जागा जिंकण्याचा दावा केला होता. तसेच याठिकाणी सत्तेवर येण्यासाठी भाजपनं मोठा जोर लावला होता. मात्र अखेर राज्यात तृणमूलचीच सत्ता आली. मात्र, ममतांना नंदिग्राममध्ये भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, या निकालाला न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका ममतांनी घेतली आहे.
निवडणूक आयोगाकडून चारे राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुका २७ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत घेतल्या गेल्या. या पाच राज्यांपैकी सध्या केवळ आसाममध्येच भाजपची सत्ता आहे, तर बंगालमध्ये एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भाजपने मजल मारली आहे.